Government Schemes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे तरी काय?

Government Schemes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे तरी काय?

Government Schemes : स्वाधार योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (Scheduled caste)आणि नवबौद्ध या प्रवर्गातील इयत्ता अकरावी,बारावी पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात (Government Hostel)प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students)वार्षिक खर्चासाठी अनुदान म्हणून काही रक्कम मंजूर केली जाते, ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana)ही 2023 सुरु केली आहे. जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण कोणतीही बाधा न येता पूर्ण करता यावे.

Aamir Khan: ‘सीतारे जमीन पर’ सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर! ‘या’ दिवशी सुरू होणार शूटिंग

योजनेची वैशिष्ट्ये :
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दिला जातो.
– या योजनेंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांना जर समाज कल्याण विभागाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर या योजनेचा विद्यार्थ्यांना फायदा होतो.
– दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे.
– या योजनेंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

“आधी बीडच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा”; भुजबळांनी पंकजा मुंडेंना सुनावलं

स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता :
– योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
– जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
– विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
– विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
– विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
– विद्यार्थी स्थानिक नसावा.
– विद्यार्थी हा प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेच्या ठिकाणचा रहिवासी नसावा.
– विद्यार्थी इ.11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
– इ. 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला 10 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असावेत.
– इ.12 वी नंतरच्या दोन वर्षासाठी जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला इ.12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
– दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
– इ.12 वी नंतर पदवीका, पदवी अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
– विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद / वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र
तंत्रशिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयामध्ये व
मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
– विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते. निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभासाठी पात्र असतो.

योजनेसाठी आवश्यक अटी आणि शर्ती :
– विद्यार्थ्यांना पात्र होण्यासाठी त्यांच्या चाचण्यांमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
– प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते.
– योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहतो. हा विशेष कार्यक्रम 7 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत असताना उपलब्ध आहे.
– विद्यार्थ्याने खोटी माहिती आणि कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील.
– त्यांना शाळेत चांगले काम करावे लागेल, अन्यथा ते पैसे मिळवू शकणार नाहीत. या कार्यक्रमात प्रत्येक 100 पैकी 3 स्पॉट अपंग विद्यार्थ्यांसाठी जतन केले जातील.

योजनेद्वारे लाभार्थीला मिळणारा फायदा
– मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाचा एकूण वार्षिक भत्ता हा 60 हजार रुपये असणार आहे.
– इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ”क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाचा एकूण वार्षिक भत्ता 51 हजार रुपये असणार आहे.
– उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाचा एकूण वार्षिक भत्ता 43 हजार रुपये इतका असणार आहे.
– वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ठोक स्वरुपात दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे
– विद्यार्थ्याचे आधारकार्ड
– विद्यार्थ्याचे दहावी पास प्रमाणपत्र
– रहिवासी प्रमाणपत्र (रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र)
– जन्माचा दाखला
– उत्पन्नाचा दाखला
– दिव्यांग प्रमाणपत्र ( दिव्यांग असल्यास )
– शाळा सोडल्याचा दाखला
– इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षेचे प्रमाणपत्र
– महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
– बँक पासबुक झेरॉक्स (आधार कार्ड लिंकिंग असणे आवश्यक)
– महाविद्यालायचे उपस्थितीचे प्रमाणपत्र
– विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र
– मोबाईल क्रमांक
– पासपोर्ट साईज फोटो

हेल्पलाईन नंबर
कार्यालय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण,
पत्ता :- आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, 3 चर्चरोड, पुणे 411001,
दूरध्वनी क्रमांक :- 022-26127569
ई-मेल : swadhar.swho@gmail.com, min.socjustice@maharashtra.gov.in

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube