मोठी अपडेट! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मोठी अपडेट! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Badlapur Crime : बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या (Badlapur Crime) घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले (Maharashtra) होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि (Railway Station) संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Badlapur Case Update : फडणवीसांची अ‍ॅक्शन, दिरंगाई करणारे तीन पोलीस अधिकारी निलंबित

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपीने आणखीही काही लैंगिक शोषण व असेच कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे आरोपीची अधिक चौकशी करण्याची गरज आहे असा मुद्दा उपस्थित करत पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. यानंतर न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बदलापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज इंटरनेट बंदच ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे रोको, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना आज न्यायालयात हजर केले जाईल.

बदलापूर लैंगिक अत्याचार घटना दुर्दैवीच; विरोधकांनी आंदोलनाला राजकीय वळण दिलं, मुख्यमंत्र्यांचा आरोप

प्रकरण काय?

बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आंदोलकांनी काल सकाळी साडेसहा वाजता शाळेबाहेर आंदोलन सुरु केले आणि त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं तसेच काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. आज येथे तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. कोणताही  गैरप्रकार घडू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना (Badlapur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. एसआयटी स्थापन केल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होईल असे सांगण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube