सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाने हादरला; नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाने हादरला; नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

Earthquake in Sangli : सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे हा धक्का जाणवल्याचं समोर आलं. सुमारे 4 वाजून 47 मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे (Earthquake) हादरे बसल्याचं नागरिक सांगत आहेत. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. (Sangli ) यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसं भीतीचे वातावरण आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गंभीर प्रकार समोर; कर्मचारी सरकारचे अन् मदत दहशतवाद्यांना, चौघांवर कारवाई

चांदोली धरणातून (Chandoli Dam) पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस (Heavy Rain in Sangli) सुरु आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले. त्यादृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा भूकंप सौम्य असल्यामुळं चांदोली धरणास कोणताही धोका नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मराठवाड्यातही झाला होता भूकंप

काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा एकूण चार जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. तर, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. याशिवाय, परभणी शहरासह सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

भूकंप आणि पावसाचं नातं काय? तुरुंगातही मनोरमा खेडकरचा तोरा कायम; चॉकलेट्स अन् बऱ्याच गोष्टींची पोलिसांकडं मागणी

मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के बसले होते तेव्हा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक निरीक्षण नोंदवले होते. मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के हे भविष्यातील चांगल्या पावसाचे चिन्ह असू शकते, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. परभणीतील गुगळी धामणगाव येथे सकाळी 7.14 वाजता सगळ्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात आहे. भूकंप हा चांगल्या पावसाचे लक्षण आहे. जेव्हा-जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा-तेव्हा खूप पाऊस पडतो लातूर जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला होता, त्या वर्षी खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळी होणार आहे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या