Maharashtra Rain Alert: सावध राहा… पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert: सावध राहा… पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : मागील दोन – तीन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. मुंबई, कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Rain Alert) जोर वाढणार असल्याने या ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत राज्यात हवामान कसे असेल याबाबतचे अंदाज प्रसिद्ध करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 जून शुक्रवारपासून राज्यातील बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आले आहे. तर 13 जूनपासून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे 14 जूनपर्यंत कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. 14 जून रोजी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास 50 ते 60 किमी इतका राहणार आहे.

Israel Iran Conflict: इस्रायली हल्ल्यानंतर इराणने दिले प्रत्युत्तर ; इस्रायलवर 100 ड्रोन डागले

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube