Rain Update : छत्री जवळच ठेवा, कारण पुढील चार दिवस..; कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट?

Rain Update : छत्री जवळच ठेवा, कारण पुढील चार दिवस..; कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट?

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. आता पुढील काही दिवसांचाही अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आहे. राज्यातील पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Update) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आलायं.

संसदरत्न पुरस्कार 2025’ची घोषणा; महाराष्ट्रातील ९ खासदारांनी मारली बाजी, वाचा कोण आहेत?

राज्यात आज 19 मे रोजी कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलायं.

माझ्या संपादकीयाची चर्चा होते तर पुस्तकाची का नाही होणार? ‘नरकातला स्वर्ग’चं प्रकाशन, राऊतांची फटकेबाजी

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती राहणार असून कमाल तापमानात कोणतीही वाढ होणार नाही. तर किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे.

‘…तिथूनच बाळासाहेब अन् माझ्यात दरी निर्माण झाली’; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इथे 60- किमी वेगाने वारे वाहतील. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube