मुंबई मोर्चाची रणधुमाळी! आंतरवाली सराटीत जरांगेंची हायव्होल्टेज बैठक, आंदोलनाचा रूटमार्च अन् अजेंडा ठरला

Manoj Jarange Patil Meeting In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. 29 तारखेला थेट मुंबईला जावून धडकणार (Mumbai March Route) आहेत. याच अनुषंगाने आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मोठी बैठक पार पडली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलंय की, राजकीय नेता, येवो किंवा कुणीही येवो. तुम्ही थोडे देखील फुटले नाही. शेवटी जात काय असते, हे तुम्ही (Manoj Jarange Patil) समाजाला दाखवून दिलंय. आता लढायचं आहे.
आता रणभुमीत उतरायचं. सगळं मैदान मराठ्यांनी गाजयवायचं अन् विजय सुद्धा मिळवायचं आता हटायचं नाही, भगवं वादळ येणार, अशी गर्जना आज मराठा समाजाच्या बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे.
लगीनघाई! युगेंद्र पवारांचा साखरपुडा, पवार कुटुंबाची नवी सून आहे तरी कोण?
मोर्चाचा रूटमार्च ठरला!
गावागावातून तयारी करायची. आपल्याला रणुभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं अन् विजय मिळवायचा. मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचाच. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईत पोहोचायचं आहे. यावेळी आपल्याला सलग जायचं आहे, कुठेही न थांबता. 27 ऑगस्टला सकाळी दहा वाजता आंतरवाली सोडायची. कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत अन् दोन रात्रीत मुंबईला पोहोचायचं. 28 जुलैच्या रात्री कोणत्याही परिस्थितीत मुंबईत पोहोचायचं. यावेळेस मार्ग बदलायचा आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
ही अंतिम लढाई…
दोन वर्ष झाली मराठा लढत आहे. दोन वर्षांचा हा संघर्ष अन् लढाई मराठ्यांनी जिंकायची. ही अंतिम लढाई. राजकीय लोकं स्वत: निवडून येण्यासाठी मरमर करत आहेत, तुम्ही पण करता. परंतु तुमच्यासाठी कोणी मरमर करत नाही. तुमच्या जातीसाठी आणि लेकरासाठी ही मरमर करायची आहे. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्याने आता स्वत:च्या मुलावर गुलाल टाकण्याची तयारी करायची आहे. शेवटच्या टप्प्यात आलोय. केवळ आठ ते नऊ टक्के मराठा आरक्षण मिळण्याचा राहिला आहे.
महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! 15 रुपयांत सातबारा थेट व्हॉट्सॲपवर…
माय-बाप समाज आरक्षणाची वाट बघत आहे. एकजुटीने राहून आपल्या जातीच्या मुलावर अंगावर गुलाल टाकायचा. आपण बाहेर पडल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. ही शेवटची बैठक आहे, असं देखील जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. पाऊस, ऊन, वारा बघायचा नाही. संपूर्ण ताकदीने लढायचं. मराठ्यांनी हुशार व्हा वेळ आणि काळ ओळखा, अशी साद मनोज जरांगेंनी घातली आहे.