Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं

Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं

Ahmednagar Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत तशी विरोधकांनी टीकेला धार दिली आहे. आताही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्याचे राज्य सरकार हे वेगवान नाही तर गतिमंद असल्याची खोचक टीका करत 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे ठासून सांगितले. नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यालयात आ. तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, समाजात अशी भावना आहे की जे लोक पक्ष सोडून गेले आहेत विशेषतः आताच्या दुष्काळी परिस्थितीत फक्त स्वतःची प्रशंसा करणारे हे सरकार आहे. या सरकारवर लोकं पूर्णपणे नाराज आहेत. त्यामुळे 2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार यात काहीच शंका नाही.

पडळकरांना आवर घालावा नाही तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरू; अमोल मिटकरांचा थेट इशारा

गतिमान कसले, हे तर गतिमंद सरकार

सध्याचे सरकार राज्यात दुष्काळी परिस्थिती असतनाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करत आहे. दुष्काळावर पैसा खर्च करण्यापेक्षा व दुष्काळ जाहीर करण्याऐवजी यांना स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी पैसे खर्च करत असतील तर ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. हे सरकार गतिमान नाही तर गतिमंद आहे, अशी टीका तनपुरे यांनी केली. आज राज्यात अनेक योजना प्रलंबित आहेत. बहुतांश योजनांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. पाच वर्षे उलटून गेली तरीही कांद्याचे अनुदान मिळालेले नाही. आज फक्त दहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे. तरी देखील अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आघाडीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या सरकारने 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देऊ असे सांगितले होते प्रत्यक्षात मात्र एक रुपयाही दिला नाही, असा आरोप आमदार तनपुरे यांनी केला.

2024 मध्ये आघाडीचेच सरकार येणार

आता 2024 मध्ये महाविकास आघाडीचेच सरकार येणार हे एखादा लहान मुलगा देखील सांगेल अशी परिस्थिती आहे. या सरकारबद्दल समाजात मोठी नाराजी आहे. माणूस ज्यावेळेस एखाद्या मोठ्या पदावर जातो त्यावेळेस खाली जनतेची काय भावना असते याकडे त्याचे लक्ष नसते. पण, सध्या जनतेत नाराजीची भावना आहे. स्वतःची प्रशंसा करून घेणारे हे सरकार आहे त्यामुळे जनता नाराज असून 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळेंवर टीका; ठोंबरे पाटील आक्रमक, म्हणाल्या, ‘कुत्रंही..,’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube