प्री वेडिंगवर बंदी ते दोनशेच लोकांमध्ये लग्न ! मराठा समाजाची आचारसंहिता

Ban on pre-weddings, marriages with only two hundred people! Code of conduct of the Ahilyanagar Maratha community: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर मराठा समाजाबरोबर इतर समाजामध्ये असलेली हुंडा देण्याची पद्धत, महागडा वस्तू भेट देणे, महागडे लग्न सोहळे हे पुन्हा चर्चेत आलेत. लग्नसोहळ्यात आलेल्या वाईट प्रथांवरही टीका होऊ लागलीय. हे लग्न सोहळे महागडे न होता ते साधे व्हावे, यासाठी अहिल्यानगरमध्ये (>Ahilyanagar) मराठा समाजाने (Maratha community) पुढाकार घेत आचारसंहिता जाहीर केलीय. 21 मुद्याची आचारसंहिता काय आहे, याची अंमलबजावणी कशी होणार हे या व्हिडिओतून पाहुया.
माणिकराव कोकाटे यांना अजूनही गोष्टी…कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार भडकले
नगरमध्ये यासाठी एन. बी. धुमाळ फाउंडेशनने पुढाकार घेतलाय. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, राजश्री शितोडे यांच्यासह पत्रकार, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत आचारसंहिता तयार केलीय. ही आचारसंहिता कशी आहे ती पाहुया….
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष ! पूर्वला सुनील टिंगरे तर पश्चिमला सुभाष जगताप यांची नियुक्ती
लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोखांमध्ये लोकांमध्ये केला जावा, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंताचा वापर करावा, प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. प्री-वेडिंग केलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केल्यास समाजाने त्यावर बहिष्कार टाकावा, कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे. नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये, कर्ज काढून लग्नात खर्च करू नये, मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. लग्नात हुंडा देऊ, घेऊ नये. खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी. पैशासाठी सुनेचा छळ करू नये. जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नकोत, लग्न विधीला मान्यवरांचे आशीर्वाद बंद करावेत. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी. लग्नात दोन्ही बाजूने बस्ता व मानपान ज्याचे त्याने करावे. मराठा समाजासाठी सुचवलेली आचारसंहिता लग्न समारंभात वाचून दाखवावी. जिथे शक्य आहे तिथे नवरा नवरीचे हस्ते पाच झाडे लावावीत. प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी नेमून जास्तीत जास्त सामूहिक विवाह घडवून आणावेत, अशी आचारसंहिता आहे.
समाजाने अनिष्ट रुढींना तिलांजली द्यावी, समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभ आचारसंहितेची अंमलबजाणी करावी, त्यासाठी तालुकावर समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना ही तनपुरे महाराज यांनी केली आहे. त्यानुसार या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अकरा जणांची सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लग्नसोहळ्यात लग्न सोहळ्याच्या आचारसंहितेची जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांची पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी केलंय. प्रास्ताविक उद्योजक एन. बी. धुमाळ यांनी केले. तर प्रा. दशरथ खोसे यांनी आभार मानले.