पावसाचा मुक्काम कायम! आज मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत कोसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

पावसाचा मुक्काम कायम! आज मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत कोसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला (Maharashtra Weather Update) आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र (Weather Update) आता पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार (Heavy Rain in Solapur) पाऊस सुरू आहे. कालपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. मागील चार ते पाच दिवसांपासून अशीच स्थिती दिसून येत आहे. मुंबईतही कालपासून पाऊस होत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सावधान! राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा धुमाकूळ; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

आज गुरुवारी विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण पट्टीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.

कालपासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नगरकरांनो सावधान! आजपासून तीन दिवस पावसाचे; जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube