महसूलमंत्री म्हणाले…आता रात्रीची वाळू वाहतूक बंद

महसूलमंत्री म्हणाले…आता रात्रीची वाळू वाहतूक बंद

Radhakrishna Vikhe Patil : एक रुपयात विमा योजनची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव ठरले आहे. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे सर्वकष धोरण कार्यान्वित झाले. आता रात्रीची वाळू वाहतूक बंद झाली. दिवसा कायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीला परवानगी दिली आहे‌. अशी माहिती महसूल मंत्री (Minister of Revenue of Maharashtra) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी तालुक्‍यातील रामपूरवाडी, न.पा.वाडी, शिंगवे येथे नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी पठारे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे अभियंता धापटकर आदी उपस्थित होते.

अनिल परबांचा पाय आणखी खोलात! ‘त्या’ प्रकरणात चार्जशीट दाखल; सोमय्यांचा धक्कादायक खुलासा

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश लोकांची शासन दरबारी अडकलेली काम मार्गी लागावी हा आहे‌. या उपक्रमातून सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी होईल. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात‌ अनुदान वर्ग करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांच्या कागदपत्रातील त्रुटी अधिकाऱ्यांनी दूर करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी आज भिंगार बंद

याबाबत मला कोणीही फोन करू नका
शेतशिवार रस्ते पाणद रस्त्यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणाचेही अतिक्रमण असले तरी गंभीरतेने कारवाई करण्याच्या सूचना देवून याबाबत मलाही कोणी फोन करु नका. हे रस्ते पावसाळ्यापुर्वी मोकळे करण्यासाठी महसूल यंत्रणेने तत्परता दाखवावी. अशा सूचना विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube