Sanjay Raut यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही; गुलाबराव पाटलांचा टोला

Sanjay Raut यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही; गुलाबराव पाटलांचा टोला

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली.

राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही

पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.

‘तुम्ही पातळी सोडली म्हणूनच..,’; शेलारांच्या इशाऱ्याला दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर

पाटील म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी कालच्या दसऱ्या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांचा मेळावा झाला तर आमची आरती थोडी होणार आहे. आम्हाला जी अपेक्षा होती ती टीका झाली,आणि ती होणार होती. मात्र आम्ही आमचा मेळावा यशस्वी केला.आम्हाला दुसरे काही माहीत नाही. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं,ते संपूर्ण जगाला माहित आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube