- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बहीण हरली, भाऊ जिंकला…धनंजय मुंडेंचा परळीत पंकजा ताईंना व्हाईट वॉश!
Market Committee Election : परळी वैद्यनाथ या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण हरली तर भाऊ जिंकला असे चित्र पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना व्हाईट वॉश दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या सर्व 18 च्या 18 जागा निवडून आल्या आहेत. […]
-
बापूराव कराळे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
पाथर्डी तालुक्यातील जोडमोहज येथील रहिवासी व नानवीज येथील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र येथे कार्यरत असलेले हवालदार बापुराव उत्तम कराळे यांना उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल यावर्षी पोलीस महासंचालकाचे पदक जाहीर झाले आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनी त्यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. प्रशासकीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक रणजीत सेठ यांनी हे पदक जाहीर केले आहे. […]
-
अवकाळी पावसाने झोडपलं अन् होत्याच नव्हतं झालं…
Unseasonal Rain : अहमदनगर जिल्ह्यात सध्या अवकाळीने थैमान घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील काही गावात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसासह काही भागात गारपीट आणि वादळाने मोठे नुकसान झालं आहे. यामुळे बळीराजा देखील हतबल झाला आहे. लोणी व्यंकनाथ, चिंभळा, पारगाव फाटा, श्रीगोंदा शहर, येळपणे यासह काही भागात दुपारी बारा वाजल्यापासून आलेल्या पावसाने आणि […]
-
‘भाकरी फिरवायला काळ, वेळ, वय अन् ताकद लागते’; राणेंचा पवारांना टोला
Narayan Rane On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे विधान केले होते. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात आहेत. हा संकेत त्यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलेला होता. पण राज्यामध्ये सुद्धा यातून काही बदल होऊ शकतो का यावर अनेक शक्यता वर्तवल्या […]
-
सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा, पराभवानंतर रवी राणांची प्रतिक्रिया
Amravati Market Committee Election : अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. हनुमान चालीसाचा गैरवापर केला त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती. ठाकूर यांच्या या टीकेवर आता आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये मिळालेल्या […]
-
वडील आजारी अन् आदित्य मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, राणेंचा दावा
Nitesh Rane vs Aaditya Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी होते. ते लवकर आजारपणातून बाहेर येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठका घेतल्या होत्या, असं राणे म्हणाले आहे. […]









