पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. आता तेच लोकं दुटप्पी भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून त्यांना पुरेसा वेळ दिला जावा म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला होता. तसेच आयोगाला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू […]
मुंबई : काँग्रसेच्या महाअधिवेशनात अडथळे आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अधिवेशन होणारच, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. पटोले म्हणाले, काँग्रेसचं रायपूर इथलं महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही, असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. […]
मुंबई : मागील काही दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात होते. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा, असा […]
पुणे : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘एमपीएससी’च्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, […]
पुणे : काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. मात्र, त्यांचा हेतू साध्य झाला नाही. आम्ही यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्वायत्त आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) सन २०२३ च्या ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती. […]
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषीफीडर सौरउर्जेवर आणण्याचे काम सुरु आहे. सोलर योजना अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. सोलर योजनेच्या माध्यमातून 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणलेजात आहे. यामुळे अधिक प्रमाणात वीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. तसेच पुढे […]