- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Dr. S Jayshankar : ‘चीन’ महाशक्ती बनणार.. आपल्याला रणनीती करावीच लागेल
पुणे : जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल. चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनीती तयार करावी लागेल. ‘चीन’ महाशक्ती बनणार असल्याने […]
-
Maratha Federation : राजेंद्र कोंढरेंच्या निवडीवर मराठा महासंघाचा आक्षेप
मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी अस्तित्वात असताना तेव्हाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी कार्यकारणीतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता व कोणाचीही संमती न घेता २९ जानेवारी २०२३ रोजी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा घटनाबाह्य व अनधिकृत आहे. तसेच यातील निर्णय बेकायदेशीर असल्याने ते अखिल भारतीय मराठा महासंघावर बंधनकारक नाहीत असे स्पष्टीकरण महासंघाने दिले आहे. अखिल […]
-
अखेर सासू-सुनेचा वाद मिटला! चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदचं कौतुक
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद (Uorfi Javed) यांचा वाद अखेर मिटल्याचं दिसून येतंय. ऊर्फी जावेद आता पूर्ण कपडे घालत असल्याने चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीला तिच्या परिधान केलेल्या कपड्यांवरुन धारेवर धरलं होतं. अखेर त्यांचा वाद आता मिटल्याचं दिसून येत आहे. […]
-
Maratha Federation : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड…
पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आज (रविवार) पंढरपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड करण्यात आली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या 2022 ते 2025 या कालावधी करिता नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र […]
-
Devendra Fadanvis : मोदींमुळेच भारताची परदेशात प्रतिष्ठा
पुणे : जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात. तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला आहे. त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि […]
-
बागेश्वर बाबावर देहू संस्थानच्या विश्वस्तांची कृपा…
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांना (Bageshwar Baba) आम्ही माफ करत असल्याचं स्पष्टीकरण देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिलंय. या प्रकरणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी कृपा करत त्यांना माफ केलंय. मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना […]








