’25 वर्षे मोदींच्या प्रेमात होतो मात्र, फसवणुकीतून प्रेमभंग’; शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांचा घणाघात

’25 वर्षे मोदींच्या प्रेमात होतो मात्र, फसवणुकीतून प्रेमभंग’; शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत खोचक टीका केली. शिंदे दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात (PM Narendra Modi) आहेत. मात्र आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो पण फसवणुकीतून आमचा प्रेमभंग झाला, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, शिंदे (Eknath Shinde) दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. मात्र आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो पण फसवणुकीतून आमचा प्रेमभंग झाला. काल परवा आले आणि प्रेमात पडले. हे प्रेम टिकत नाही. सत्ता असेपर्यंत हे प्रेम टिकेल. हे प्रेम नाही तर सत्ता आणि ईडीची भीती बोलत आहे.

Sanjay Raut : काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत, संजय निरुपम कोण? राऊतांच्या वक्तव्याने जागावाटपाचा तिढा वाढला

निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले, काँग्रेससोबत बोलणी योग्य मार्गाने सुरु आहे. 4 दिवसांत आम्ही दिल्लीत जाऊन काँग्रेससोबत अंतिम चर्चा करणार आहोत मसुदा ठरवू, मात्र जागावाटपात कुठलीही अडचण नाही. काँग्रेसकडून जागावाटपाबाबत काही जाहीर वक्तव्य आलं नाही कुणी वरिष्ठ बोलले नाहीत. जो जिंकेल त्याची जागा असे आम्ही ठरवले आहे, आकडे वाढवायला कुणालाही जागा मिळणार नाही. काँग्रेसने कुठल्याही जास्त जागा मागितल्या नाहीत. राज्यात काँग्रेसचा बेस आहे हे मान्य करावे लागेल. देशात 300 ठिकाणी काँग्रेस भाजप थेट लढत आहे त्या जागा 2024 भविष्य ठरवतील.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला का घाबरता ?

2024 ला देशात आणि राज्यात (Lok Sabha Election 2024) परिवर्तन होईल, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहेत उद्या हे ईव्हीएमबाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही? आपण विष्णूचे 13 वे अवतार आहात मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? असे सवाल उपस्थित करत अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाही. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.

ईव्हीएमच्या माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता नाही. देशात 19 लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले.

Sanjay Raut : तुकाराम मुंडेंचे नाव घेत राऊतांनी सांगितला ‘महानंद’ वाचवण्याचा मास्टर प्लॅन

जागावाटप फॉर्म्युला तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील. महाविकास आघाडीने शिवसेनेला प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही त्यांच्यासोबत युती जाहीर केली आहे. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे जागांसंदर्भात लहान सहान गोष्टी आहेत. या वातावरणात प्रकाश आंबेडकर नवीन आहेत मात्र देशाचे नेते आहेत, आमच्या या आघाडीत ते नवीन आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube