ड्रग्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो का? सुषमा अंधारे यांचा संतप्त सवाल

ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तोफ डागली.

  • Written By: Published:
Untitled Design (121)

Sushma Andhare’s angry question on Panchgani drugs case : पाचगणीतील ड्रग्स प्रकरणावरून सरकार, प्रशासन आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांच्यावर शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तोफ डागली आहे. मागे पाचगणीमध्ये जी कारवाई झाली होती, त्यात 45 किलो कोकेन जप्त झाल्याचं उल्लेख करत त्यांनी या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची नावं देखील जाहीर करायला हवी, अशी मागणी केली होती. त्यांनी मोहम्मद नावेद सलीम परमार (भेंडी बाजार), अंसारी (बिलाल मस्जिद, नागपाडा), सोहेल हशिद खान (मुंबई), मोहम्मद ओयस रिजवान (भिवंडी) यांच्यासह अन्य आरोपींची नावे वाचून दाखवली.

हिंदुत्व धोक्यात असल्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पाचगणीसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी ड्रग्सचा विळखा असेल आणि पालकमंत्र्यांनाच त्याची कल्पना नसेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. पाचगणी हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे पर्यटनस्थळ असून, अशा ठिकाणी ड्रग्ससारखे गंभीर प्रकार घडत असतील तर राज्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्न निर्माण होतो, असे अंधारे म्हणाल्या.

बिबट्याची दहशत…; विखेंचा तो किस्सा…; आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले वास्तव

या ड्रग्स प्रकरणात मुंबईहून आलेल्या यंत्रणांनी कारवाई केली, मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे स्पष्ट दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास आणून देतं पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि प्रशासनाला देखील टार्गेट केलं. मुंबईचे अधिकारी कारवाई करतात, मात्र साताऱ्यातील यंत्रणा ढिम्म का? असा सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी प्रकाश शिंदे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. प्रकाश शिंदे यांनी कालच आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे. गुगल सर्च, ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म, रेटिंग, मालकाचे नाव, फोन नंबर आणि मुलांची नावे यावरून हे हॉटेल प्रत्यक्षात प्रकाश शिंदे यांच्याच नावावर चालते, असा आरोप करत त्याबाबतचे पुरावे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

त्याचप्रमाणे या ड्रग्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो का ? असा गंभीर सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याचबरोबर कोयना धरण परीसरातील नियमभंगाच्या मुद्द्याकडे देखील त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. 75 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही व्यावसायिक किंवा निवासी बांधकाम करण्याला परवानगी नसताना देखील नियमबाह्य बांधकाम कसं झालं? याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तुमच्या अधिकारातल्या अभियंत्यांना हे सांगितलं नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे ड्रग्सऐवजी संबंधित ठिकणी स्फोटकांचा कारखाना असता तर, राज्यातल्या नेत्यांच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण झाला असता? या गंभीर प्रश्नाकडे देखील लक्ष वेधलं. तसेच पत्रकार परिषद झाल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकारी घटनास्थळी कसे पोहोचले, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला.

मोठी बातमी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर

या सगळ्या बहुचर्चित प्रकरणाची निष्पक्ष चौकडी व्हावी, कोणालाही मंत्रिपदाचा, सत्तेचा किंवा उपमुख्यमंत्रीपदाच्या विशेषाधिकाराचा फायदा मिळू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणात मी कोणाला आरोपी ठरवत नाही, मात्र ज्यांची कोणाची नाव सध्या या प्रकरणात चर्चेत आहेत त्यांची चौकशी झालीच पाहिजे. असं स्पष्ट मतं व्यक्त करतं त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. बीडच्या वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता. तर मग आता या प्रकरणात प्रकाश शिंदे तर उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत, मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकत, असं वाटलं असेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्यासाठी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत प्रयत्न करणार असून, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून देखील हा मुद्दा मांडणार असल्याचे जाहीर केले. अखेरीस, या प्रकरणातील तपासात सहभागी अधिकारी, साक्षीदार आणि आरोपींच्या सुरक्षेचीही जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

follow us