मनसेशी युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, बाळासाहेबांनी मिरचीची धुरी दिली असती; उपमुख्यमंत्री शिंदे भडकले

Eknath Shinde : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असून या निमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आजचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
वरळी डोममध्ये आयोजित या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे. आजचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच आपण बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेचं नाव जपलं असं देखील या मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरे गटाने विधानसभेत काँग्रेसच्या वोटबँकेमुळे जागा जिंकले. विधानसभेत ठाकरेंना शिवसेना मतदारांनी थर्ड दिला. त्यांनी शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात केला. बाळासाहेबांचा विश्वासघात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. इतक्या वेगात रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला. बाळासाहेबांनी विरोध केलेल्या काँग्रेसच्या दावणीला ठाकरेंनी शिवसेना बांधली. खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना बाळासाहेबांनी मिरचीची धुरी दिली असती. आज मनसेशी युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत अशी टीका या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हिंदुत्वासाठी आम्ही तडजोड करणार नाही अशी ग्वाही देखील या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिली.
ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
काही जणांना निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते, हिंदुत्वाची आठवण येते पण ज्यांने विश्वासघात केला. ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांशी बेईमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत देखील मतदान करणार नाही असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.