महिला आयोगाची अध्यक्षा राजकीय पक्षाशी कशाला हवी…, तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर हल्लाबोल

महिला आयोगाची अध्यक्षा राजकीय पक्षाशी कशाला हवी…, तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर हल्लाबोल

Trupti Desai : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. मात्र महिला आयोग काय करते यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. आता याच मुद्दयांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे म्हणजे महिला आयोगला (Women Commission) सुट्टी आहे. महिलांवर अत्याचार, हुंडाबळी अशा घटना राज्यात दररोज घडत आहे. महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पक्षाशी पदाधिकारी कशाला असायला हवी. अशा शब्दात तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जोरदार टोला लगावला आहे.

एखाद्या पक्षाशी पदाधिकारी ही महिला आयोगाची अध्यक्ष असायला नको. त्याऐवजी 24 तास काम करणारी व्यक्ती त्याठिकाणी असावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

पुणेमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण घडले व हुंडाबळी याबाबात एक संतापाची लाट समाजात निर्माण झाली. दरदिवशी महिलांवर अत्याचाराच्या घटना या घडत असतात. मात्र याला रोखण्यासाठी व महिलांना न्याय मिळवणून देण्यासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या आयोगाच्या अध्यक्षा या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुपाली चाकणकर या आहेत. या पदावर राजकीय व्यक्तीच कशाला हवा अशी ओळख निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी देखील याच मुद्द्यावरून रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाल्या देसाई…

महिलांवर अत्याचार, हुंडाबळी अशा घटना राज्यात दररोज घडत आहे. महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पक्षाशी पदाधिकारी कशाला असायला हवी. एखाद्या पक्षाशी पदाधिकारी ही महिला आयोगाची अध्यक्ष असायला नको. त्याऐवजी 24 तास काम करणारी व्यक्ती त्याठिकाणी असावी. आज ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यां फार वेगळ्या आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी गामीण भागात गेले पाहिजे त्याठिकाणी महिला आयोगाच्या सदस्यता देखील नेमल्या जात नाही ही शोकांतिका आहे. पक्षीय राजकारण महिला आयोगामध्ये सुरु आहे. अनेकवेळा महिला आयोगाच्या सदस्यपदासाठी अर्ज केला की त्यांना पक्षात प्रवेश करण्यास सांगितले जाते. हा खेळ थांबवला पाहिजे.

आज राज्यात शेकडो मुलींचे बळी जात आहे. असे प्रकार जर घडत असतील तर महिला आयोग कोठेतरी कमी पडत आहे. तसेच पोलीस प्रशासन देखील कमी पडत आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो आरोपींना पाठीशी घातले जाते यामुळे असे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश 

मुख्यमंत्र्यांना साकडं

तृप्ती देसाई म्हणाल्या महिला आयोगाबाबत आम्ही थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व भेट घेऊन याबाबत चर्चा केली. महिला आयोग हा जर महिलांसाठी असेल तर यामध्ये पक्षविरहित महिला ही महिला आयोगाची अध्यक्षा असली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube