जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

Ajit Pawar : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (NCP) 26 व्या वर्धापना दिनानिर्मित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना निवडणुकीत जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष नसून जनतेचा विचार करणारा आहे. सत्ता येईल आणि सत्ता जाईल परंतु पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे. सगळ्याच्या अधिकाराचे रक्षण झालेच पाहिजे. विचारांना कधीही तडजोड केली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अधिक जोमाने काम करायचे आहे. मुंबईत वार्ड वाईज निवडणूक होईल. जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा असे आदेश यावेळी बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहे. सर्वांनी सर्व समाजाच्या जातीच्या लोकांना सभासद नोंदीत सहभागी करून घ्या, मोठ्या जिल्ह्यांनी पाच लाख पेक्षा जास्त सभासद नोंदणी करा असं या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच पक्षाला कट्टरवाद मान्य नाही आणि भविष्यात देखील मान्य नसणार असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांन समोर स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचा आहे. त्यासाठी आपली ताकद अजून वाढवावी लागेल. नवीन येणाऱ्याचे स्वागत करूच, जुन्यानी विश्वस ठेवा त्यांचाही चांगल होईल, सगळ्यांना संधी दिली जाईल. राज्यचा विकास हाच, देशाचा विकास हाच राष्ट्रवादी पक्षाच्या अजेंड्यावर असेल असेही यावेळी अजित पवार म्हणाले. ध्येय प्राप्तीसाठी सत्ता असणे महत्वाचे असते.
दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला
येत्या काळात राष्ट्रवादीची कार्यलय कार्यकर्ते भरलेली, गजबजलेली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आहे. पक्ष कार्यलयात गेलो तर काम होते असा विश्वास निर्माण झाला तरच पक्ष आणि लोक सहभाग वाढेल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.