Mumbai Police : ६० कोटींहून अधिक रुपयांचा सायबर फ्रॉड, गुन्हे शाखेकडून १२ आरोपींना अटक

Mumbai Police : ६० कोटींहून अधिक रुपयांचा सायबर फ्रॉड, गुन्हे शाखेकडून १२ आरोपींना अटक

मुंबई मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने बोगस कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात सायबर फ्रॉ (Cyber ​​Fraud) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत १२ जणांना अटक केली आहे. सायबर फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष-२ पथकाने केला. कांदिवली (पूर्व) येथील बोगस कंपन्यांमधून हे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

धक्कादायक! सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत सर्वांत वरच्या क्रमांकावर; ब्राझील आणि स्पेनही मागे 

डी. जी. सर्च कन्सलटन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टीक प्रा. लि. या नावाखाली बँक पासबुक, चेकबुक, ई-मेल अकाऊंट, सिमकार्ड अॅक्टीवेट करून पुढे फसवणुकीसाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी ९४३ बँक खात्यांचा तपास केला, त्यापैकी १८१ खात्यांचा वापर या फसवणुकीसाठी झाल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांना छाप्यात आरोपींकडून २५ मोबाईल, ४६ एटीएम कार्ड, ३० चेकबुक, १०४ सिमकार्ड, लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त केले.

आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे रॅकेट देशभर पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॅपटॉपच्या तपासणीत तब्बल ९४३ बँक खाते वापरल्याचे आणि त्यापैकी १८१ खाते सायबर फसवणुकीसाठी असल्याचे निष्पन्न झाले. सायबर नियंत्रण कक्ष हेल्पलाईन १९३० वर या खात्यांशी संबंधित ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत’; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका 

६० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक..
मुंबईतील १६ प्रकरणांपैकी १४ गुन्हे नोंदवले गेले असून महाराष्ट्र व इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल आहेत. या टोळीने केवळ मुंबईत १.६७ कोटी, महाराष्ट्रात १०.५७ कोटी तर देशभरातून तब्बल ६० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केलेली ही कारवाई सायबर गुन्ह्याविरोधातील मोठी कामगिरी ठरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube