“महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणूकच हायजॅक केली”, राहुल गांधींच्या आरोपांना राऊतांचं बळ

“महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणूकच हायजॅक केली”, राहुल गांधींच्या आरोपांना राऊतांचं बळ

Sanjay Raut Criticized BJP : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने कालच (Election Commission) स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही लेख लिहून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिलं. विरोधी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने मात्र राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप केला आहे.

राऊत पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये मुलाखती देऊन ज्या भावना मांडल्या आहे त्या त्यांनी आधीही मांडल्या आहेत. सातत्याने राहुल गांधी बोलत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही भारतीय जनात पार्टीने चोरली, लुटली दरोडे घातले हे आम्ही देखील बोलत आहोत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नाही. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका आम्ही जिंकल्या होत्या. असं काय झालं की इतका मोठा एकतर्फी विजय तुम्हाला (महायुती) मिळावा? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

“झेडपी, मनपा निवडणुका महायुती एकत्रित लढणार”, मंत्री शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य

खोटं बोलण्याचं नोबेल मोदींना द्या

लाडकी बहीण या आवरणाखाली महायुतीने ही निवडणूक हायजॅक केली. मी असं म्हणतो विधानसभेची निवडणूक झालीच नाही. राहुल गांधींनी जे पाच मुद्दे उपस्थित केले ते आंतरराष्ट्रीय पातळीवर केले. मोदी, शहा, फडणवीस यांनी लोकशाही कशी हायजॅक केली. निवडणूक आयोगापासून अनेक संस्था कशा अस्वस्थ करून सोडलेल्या आहेत. आता भाजपाचे लोक म्हणत आहेत की राहुल गांधी यांची विधाने खोटी आहेत. या देशांमध्ये खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार हा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांना दिला पाहिजे.

फडणवीसांनी आता ग्रंथ लिहावा

राहुल गांधी असामान्य व्यक्ती आहे. ते संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. त्यांनी जी विधाने मांडलेली आहेत त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. फडणवीस यांच्यात अंगाचा तिळपापड झालेला आहे. देशातील 14 प्रमुख वृत्तपत्रांनी राहुल गांधी यांचा लेख छापल्याने आता भारतीय जनता पक्ष उघडा पडला आहे. फडणवीस यांनी आता नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी तुमचा विजय कसा झाला. अजित पवार, शिंदे कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती आहे.

निवडणूक आयोगाने मतदार केंद्रावर सेटिंग केली असं राहुल गांधी म्हणतात. फक्त महाराष्ट्रात नाही तर जगातील लोकशाही मानणाऱ्या देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील जनतेला कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि कंपनी कशा पद्धतीने निवडणुका जिंकत आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मनाला विचारावं जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमी असतील तर काय चर्चा झाली हे त्यांच्या मनाला विचारावं. तुम्ही किती भ्रष्ट आहात हे सर्वोच्च न्यायालयाने कमिशन बाजीवर हल्ला केला त्यावरून स्पष्ट होतं आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

“फडणवीस CM झाल्याने बरं झालं, मागचा अडीच वर्षांचा काळ वाईट”, महाजनांनीही काडी टाकली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube