live now
Budget 2025 LIVE : मोदी सरकराचं नोकरदारांना मोठं गिफ्ट; 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगावरील औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली. येत्या 3 वर्षात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. अशी 200 केंद्रे पुढील आर्थिक वर्षातच बांधली जातील.
LIVE NEWS & UPDATES
-
12 लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
- 0-4 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही
- 4-8 लाखांपर्यंत 5 टक्के टॅक्स
- 8-12 लाखांपर्यंत 10 टक्के टॅक्स
- 12-16 लाखांपर्यंत 15 टक्के टॅक्स
- 16-20 लाखांपर्यंत 20 टक्के टॅक्स

#UnionBudget2025 | Finance Minister Nirmala Sitharaman says, " I am now happy to announce that there will be no income tax up to an income of Rs 12 lakhs." pic.twitter.com/rDUEulG3b9
— ANI (@ANI) February 1, 2025
-
अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मोठी घोषणा करण्यात आली आहे; त्यांना चार वर्षांसाठी रिटर्न भरता येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे. तसेच आयटीआर आणि टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली असून, टीडीएस मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
-
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी संबंधित 36 औषधे पूर्णपणे शुल्कमुक्त
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 36 जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. कर्करोगावरील उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. 6 जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून 5 टक्के करण्यात येणार आहे.
-
काय स्वस्त होईल?
जीवरक्षक औषधे स्वस्त होतील. कॅन्सरची औषधे स्वस्त होतील. एलईडी-एलसीडी टीव्हीच्या किमती कमी होतील. यांवर लावण्यात येणारे कस्टम ड्युटी कमी करण्यात आली. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होतील. ईव्ही आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
-
सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब
तरुणांच्या मनात कुतूहल, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५०,००० अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात येणार आहे.
-
नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयकाबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. सरकार पुढील आठवड्यात आयकराचे नवीन विधेयक आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी करदात्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. असे मानले जात होते की जुन्या आणि नवीन दोन्ही आयकर प्रणालींमध्ये करदात्यांना अनेक सूट आणि कपात दिली जाऊ शकते. मात्र ही प्रतीक्षा आठवडाभराने वाढली आहे.
#UnionBudget2025 | "I propose to introduce the New Income Tax Bill next week," says FM Nirmala Sitharaman in Parliament pic.twitter.com/yfHIjzyMxu
— ANI (@ANI) February 1, 2025
-
गरिबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार
गरिबांसाठी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख अपूर्ण घरे पूर्ण केली जाणार आहेत.यामुळे घराचं स्वप्न बघणाऱ्या गरिबांना हक्काचं घर मिळणार आहे.
-
मेडिकल विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयआयटीमध्ये ६५०० जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 3 AI केंद्रे उघडली जातील. याशिवाय 5 वर्षात मेडिकलमध्ये 7500 जागा वाढवण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचे बजेट.
-
६ प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या जाणार : अर्थमंत्री
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या जातील. यात
१. कर आकारणी (Taxation)
२. शहरी विकास (Urban Development)
३. खाण क्षेत्र (Mining)
४. आर्थिक क्षेत्र (Financial Sector)
५. वीज आणि ऊर्जा क्षेत्र (Power Sector)
६. नियामक सुधारणा (Regulatory Reforms)
-
एमएसएमई क्षेत्रात क्रेडिट कव्हर वाढवले जाणार
एमएसएमई क्षेत्र
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या एक कोटी आहे आणि त्यांच्याशी ५.७ कोटी लोक जोडलेले आहेत. हे भारताला जगात उत्पादन केंद्र बनविण्यासाठी उपयुक्त आहे. या एमएसएमईजचा निर्यातीत ४५ टक्के वाटा आहे. एमएसएमईंसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवले जाणार असून एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट वाढवली जाईल. वर्गीकरणासाठी उलाढाल मर्यादा दुप्पट केली जाणार.कस्टमाइज्ड क्रेडिट
सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादेसह कस्टमाइज्ड क्रेडिट्स जारी केले जातील. पहिल्या वर्षी अशी १० लाख कार्डे दिली जातील.मुदत कर्ज
पहिल्यांदाच उद्योजकांना २ कोटी रुपयांचे मुदत कर्ज दिले जाईल. पाच लाख महिला आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोक त्याच्या कक्षेत येतील.#UnionBudget2025 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "The investment and turnover limits for classification of all MSMEs will be enhanced to 2.5 and 2 times respectively. This will give them the confidence to grow and generate employment for our youth." pic.twitter.com/VNP0Clgj7f
— ANI (@ANI) February 1, 2025
-
डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी ६ वर्षांचा कार्यक्रम
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकार डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सहा वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार असून, तूर (अरहर), उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगतले.
-
पंतप्रधान धनधान्य योजनेची घोषणा – अर्थमंत्री
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. सीतारामन म्हणाल्या की, गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या भल्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शेतीची वाढ, ग्रामीण विकास आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष देणार आहे. 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू करण्यात येत आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
#UnionBudget2025 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "PM Dhan Dhaanya Krishi Yojana - developing agri districts program...Our government will undertake a PM Dhan Dhaanya Krishi Yojana in partnership with states. Through the convergence of existing schemes and… pic.twitter.com/5rQwdGQOqE
— ANI (@ANI) February 1, 2025
-
सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख मुद्दे
- तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य
- डाळींमध्ये स्वावलंबनाचे मिशन
- बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करणार
- मच्छिमारांसाठी विशेष अर्थव्यवस्था
- कर, ऊर्जा आणि शहरी विकासावर भर
- गरीब, युवक, शेतकरी आणि महिला शक्तीवर भर.
-
सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आपली अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, गेल्या 10 वर्षात आपला विकास आणि सुधारणांनी जगाला आकर्षित केले आहे, आज देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, भारतावर जगाचा विश्वास वाढला आहे.
#UnionBudget2025 | केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, "हमारी अर्थव्यवस्था सभी प्रमुख अर्थव्यवस्थाओं में सबसे तेजी से बढ़ रही है। पिछले 10 वर्षों के हमारे विकास ट्रैक रिकॉर्ड और संरचनात्मक सुधारों ने वैश्विक ध्यान आकर्षित किया है। इस अवधि में भारत की क्षमता और संभावनाओं… pic.twitter.com/0VutfI2CO8
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2025
-
हा अर्थसंकल्प विकासाचा वेग वाढवेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प विकासाचा वेग वाढवणे, सर्वांगीण विकास साधणे, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत संवेदनशीलता मजबूत करणे आणि मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवणे या प्रयत्नांचा एक भाग आहे.
-
सीतारमण यांच्या हातातील बजेट ब्रीफकेस लाल रंगाचीच का असते?
यंदा सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, बजेट ब्रीफकेस ही लाल रंगाचीच का असते? तर, लाल रंगाची ब्रीफकेसची परंपरा ब्रिटीश काळापासून सुरू असून, याची सुरूवात ब्रिटीश चांसलर ग्लॅडस्टोन यांनी 1860 मध्ये राणीच्या मोनोग्रामसह लाल लेदर ब्रीफकेस सादर केल्यावर झाली होती. हिंदूधर्मातही लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. यासाठी बजेट ब्रीफकेससाठी लाल रंगाचा वापर केला जातो. लाल रंग हा नशीब, शुभ आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानला जातो. यामुळे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात लाल रंगाने केली जाते.
-
अर्थसंकल्पात काय असणार खास?
सादर होणाऱ्या आजच्या बजेटमध्ये 100 अमृत भारत ट्रेन आणि 10 पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेनची घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय नॉन-एसी कोचची संख्या वाढवण्याची घोषणाही केली जाऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून कवच विस्तारासाठी सुमारे 12 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेल्वेला 3 लाख कोटींहून अधिक निधी दिला जाऊ शकतो. याशिवाय मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता असून 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये थेट सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे.NPS, EPS आणि UPS सारख्या पेन्शन योजनांबाबत अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. NPS मध्ये निवृत्तीनंतर, वार्षिकीमध्ये 40% निधी गुंतवण्याचे बंधन संपू शकते.
-
सीतारामन यांनी परिधान केली खास साडी
आज सादर होणाऱ्या बजेटसाटी अर्थमंंत्री निर्मला सीतारामन यांनी दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी आर्ट साडी परिधान केली आहे. दुलारी देवी यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी दुलारी देवी यांनी ही साडी सीतारामन यांना भेट म्हणून दिली होती. तसेच अर्थसंकल्पाच्या दिवशी ती घालण्यास सांगितले होते.
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from the Ministry of Finance.
She will present and read out the #UnionBudget2025 at the Parliament through a tab, instead of the traditional 'bahi khata'. pic.twitter.com/89XblFTwmk
— ANI (@ANI) February 1, 2025
