चलनातून 500 रुपयांच्या नोट बंद होणार? PM मोदींच्या निकटवर्तीयाची जाहीर सभेत मागणी अन्..

चलनातून 500 रुपयांच्या नोट बंद होणार? PM मोदींच्या निकटवर्तीयाची जाहीर सभेत मागणी अन्..

Ban Rs 500 Notes : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी मोठी मागणी केली आहे. चलनातून 500 रुपयांच्या नोटा काढून टाका अशी मागणी त्यांनी केली. वायएसआर कडप्पा जिल्ह्यातील टीडीपीच्या महानाडू कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली. देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि आर्थिक देवाणघेवाणीत पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल करन्सीला (Digital Currency) प्राधान्य दिले पाहिजे, असे मत नायडू यांनी व्यक्त केले.

डिजिटल करन्सीच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक अहवाल दिला होता. यात मोठ्या नोटांची छपाई बंद करण्याची शिफारस केली होती. मोठ्या नोटा जोपर्यंत चलनात आहेत तोपर्यंत रोख स्वरुपात देवाणघेवाणीची स्थिती कायम राहील. परंतु, जर डिजिटल व्यवहार झाले तर असा प्रत्येक व्यवहार ट्रेस करता येईल. यामुळे पारदर्शकता येईल असेही नायडू म्हणाले. जगभरात सध्या डिजिटल करन्सीचं चलन वाढत चाललं आहे. आता भारतानेही या दिशेने ठोस पावले उचलायली हवीत. क्यूआर कोडच्या माध्यमातून कार्यकर्ते निधी जमा करु शकतात असे उदाहरण देऊन नायडूंनी समजावून सांगितले.

ममता बॅनर्जी सर्वात गरीब तर नायडू सर्वात श्रीमंत CM; संपत्तीचे आकडे ऐकून व्हाल थक्क!

500 च्या नोटा बंद करण्याची गरज का?

आता वेळ आली आहे की पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकाव्यात आणि डिजिटल व्यवहारांवर भर द्यावा. यामुळे राजकीय प्रक्रियेत पारदर्शकता येईल. देशाची अर्थव्यवस्था साफ आणि सुरक्षित होईल. यानंतर त्यांनी या मुद्द्यावर लोकांना विचार करण्यास सांगितले आणि समर्थनासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. नायडू यांच्या या प्रस्तावाला तंत्रज्ञानाचे आणि पारदर्शकतेचे समर्थक पाठिंबा देत आहेत. तर तज्ज्ञ लोक ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता आणि पायाभूत सुविधांतील अडथळ्यांकडे लक्ष वेधत आहेत.

2016 मध्येच दिला होता अहवाल

2016 मध्ये तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू त्यावेळी निती आयोगांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ, भागीदार आणि मुख्यमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख होते. आम्ही समितीचा अहवाल सादर केल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार आणि 500 च्या नोटा चलनात आणल्यानंतर मोठ्या नोटा बंद कराव्यात अशी मागणी केली होती. डिजिटल करन्सी चलनात आणावी. त्यामुळे बेकायदेशीर व्यवहार आणि भ्रष्टाचार सहज समोर आणता येईल असा सल्ला मी दिला होता असे नायडू यांनी सांगितले.

Andhra Pradesh Chemical Factory : मोठी बातमी! आंध्र प्रदेशमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, 15 ठार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube