उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! आभाळ फाटलं, 9 जण बेपत्ता; चारधाम यात्रा थांबवली

Heavy Rain In Uttarakhand Cloudburst In Uttarkashi : उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे मोठा विध्वंस (Heavy Rain In Uttarakhand) झालाय. हिमाचलमधील कांगडा आणि कुल्लू आणि आता उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पावसाने आपत्तीचे रूप धारण केले आहे. उत्तरकाशीच्या बारकोट-यमुनोत्री रस्त्यावर बालीगडमध्ये ढगफुटी (Cloudburst In Uttarkashi) झाली. यामुळे मोठे नुकसान झाले, येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. तातडीने शोध मोहीम सुरू केली. तहसील बारकोटमधील सिलाई बंदजवळ ढगफुटी झाल्याची माहिती आहे. जिथे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या जागेवर काम करणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता झाले आहेत. दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता आणि कामगार येथे तंबू लावून काम करत होते. परंतु ते रविवारी सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय.
यमुनोत्री मार्गावरही परिणाम
ढगफुटीमुळे यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाला आहे. उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी माहिती दिली की, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग सिलई बंदजवळ दोन-तीन ठिकाणी रस्तेही बंद करण्यात आले होते. याबाबतची माहिती एनएच बारकोटला देण्यात आली आहे.
#WATCH | Uttarkashi, Uttarakhand | 8-9 workers staying at an under-construction hotel site went missing after the construction site was damaged due to a cloud burst in Silai Band on Barkot-Yamunotri Marg. Yamunotri Marg has also been affected: Uttarkashi DM Prashant Arya
Rescue… pic.twitter.com/k6FiyZCdCa
— ANI (@ANI) June 29, 2025
5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
याशिवाय, नौगाव ब्लॉक आणि राजगढी तहसीलमधील कुथनौर येथेही ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. येथे स्थानिक ग्रामस्थांच्या शेतीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. कुथनौरमध्ये कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही, ही दिलासादायक बाब आहे. हवामान खात्याने ऋषिकेश, रुरकी, रानीखेत, देहरादून, उत्तरकाशीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
क्रेडाईची राज्यस्तरीय बैठक: बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींवर विचारमंथन
तीर्थयात्रा 24 तासांसाठी स्थगित
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर, चार धाम यात्रा देखील पुढील 24 तासांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ऋषिकेशला पोहोचलेल्या यात्रेकरूंना तिथेच थांबवण्यात येत आहे. यासोबतच पुढे गेलेल्या यात्रेकरूंनाही सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात येत आहे. ही माहिती गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी दिली आहे.