Karnataka Politics : देवेगौडांचा पक्ष भाजपात? सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ!

Karnataka Politics : देवेगौडांचा पक्ष भाजपात? सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ!

Karnataka Politics : कर्नाटक या काँग्रेसशासित राज्यात सध्या वेगवान (Karnataka Politics) घडामोडी घडू लागल्या आहेत. येथे भाजपाच्या ऑपरेशन लोटसची चिंता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना सतावत असतानाच काँग्रेसअंतर्गतही धुसफूस वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केलेल्या एका वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी कधीकाळी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दलावर (धर्मनिरपेक्ष) जोरदार टीका केली. आगामी काळात जनता दल भाजपात विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. जेडीएसने (JDS) आपल्या नावातील सेक्युलर शब्द काढून टाकावा, अशी खोचक टीका सिद्धरामय्या यांनी केली.

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं

तुमाकुरू ग्रामीण मतदारसंघातील जेडीएसचे माजी आमदार गौरीशंकर आणि दसराहल्लीचे माजी आमदार आर. मंजुनाथ यांचा सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी देवेगौडांवर खोचक शब्दांत टीका केली. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, आगामी काळात देशात राजकीय ध्रुवीकरण आणि मतांचेही ध्रुवीकरण होणार आहे. एका बाजूला जातीयवादी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची योजना भाजप कधीही सोडणार नाही. आता देवेगौडा आणि त्यांचे कुटुंबीय त्यात सहभागी झाले आहेत, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली.

देवेगौडांवर टीका करताना ते म्हणाले, जेडीएस हा काही राजकीय पक्ष नाही तर तो माजी पंतप्रधान देवेगौडा आणि कुटुंबाचा पक्ष आहे. ही एक कौटुंबिक पार्टी आहे. त्यामुळे उद्या जरी जेडीएस भाजपात विलीन झाला तरी आम्हाला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जोपर्यंत देवेगौडा आहेत तोपर्यंत राजकीय कारणांमुळे विलीनीकरण होणार नाही. नंतर मात्र विलीनीकरण होईल, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

दरम्यान, कर्नाटकात याआधी चार महिन्यांपूर्वी एक राजकीय नाट्य घडले होते. राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकूण 20 मंत्री आपली कामे नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले गेले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटले होते की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube