हे युग युद्धाचं नाही, तसं आतंकवादाचंही नाही…पण…पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधनात काय म्हणाले?

हे युग युद्धाचं नाही, तसं आतंकवादाचंही नाही…पण…पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधनात काय म्हणाले?

PM Modi on Operation Sindoor :  हे युग युद्धाचं नाही, पण हे युग दहशतवादाचंही नाही. (Operation) दहशतवाद सहन केला जाणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी देत आहेत, ते पाहाता एकेदिवशी दहशतवाद पाकिस्तानला संपवेन. पाकिस्तानला वाचायचं असेल तर त्यांनी दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला हवं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी देशाला संबोधन केलं त्यामध्ये बोलत होते.

तर जशास तसं उत्तर

भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. यापुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई होणार असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला

भारताचे तिन्ही सैन्य दलं सातत्याने अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. ज्या ठिकाणाहून दहशतवादी तयार होतात, तिथे हल्ला केला जाईल. युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला पराभूत केलंय. वाळवंट आणि डोंगराळ भागातही आपण क्षमता दाखवली आहे. या ऑपरेशन दरम्यान, मेड इन इंडिया शस्त्र कामी आले आहेत. दहशतवादाविरोधात एकजूट राहाणे हीच आपली शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले.

नवी सीमारेषा

भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवी सीमारेषा आखलीय. जर भारतावर हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी-शर्तींनीच उत्तर देणार, असंही मोदींनी स्पष्ट केलंय..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube