Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज

Military bases, equipment operational, ready for next mission says Air Marshal AK Bharti : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या महासंचालकांनी (DGMO) सविस्तर माहिती दिली. तसेच भारताचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत असून, गरज पडल्यास पुढील कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज असल्याचा मोठा संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानचे ड्रोन हल्ले अन् अचानक लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीचा उल्लेख
पहलगामपर्यंत पापाचा प्याला भरला होता
एयर मार्शल एके भारती म्हणाले की, ७ मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आम्ही पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन नष्ट केले. पहलगामपर्यंत पाकिस्तानच्या पापांचा प्याला भरला असल्याचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी यावेळी सांगितले. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्याप्रमाणे कारवाई केल्याचे ते म्हणाले. यावेळी भारताचे सर्व मिल्ट्री बेस आणि सर्व सिस्टम पुढील मिशनसाठी तयार असल्याचे मोठा मेसेज वजा इशारा एअर मार्शल ए.के. भारती यांनी पाकिस्तानला दिला आहे.
…म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला पहिले केला
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. म्हणून, पाकिस्तानने ही लढाई स्वतःची लढाई बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. ते पुढे म्हणाले की, भारताच्या हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणे अशक्य असून, पाकिस्तानने डागलेले चिनी क्षेपणास्त्रही अयशस्वी झाले.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान सक्सेसफुल; पाकिस्तानला फोडला पुरता घाम
पुढील मोहिमेसाठी सर्व यंत्रणा आणि तळ सज्ज
व्हॉइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर बारीक देखरेख ठेवण्यासाठी नैदलाचीही मदत घेण्यात आली. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून सातत्याने देखरेख ठेवली जात होती. यामुळे पाकिस्तानकडून करण्यात येणारा प्रत्येक हल्ला निष्प्रभ करण्यात भारताला यश मिळाले. या सर्व कारवायांमध्ये जास्तीत जास्त रडारचा वापर करून ड्रोन आणि लढाऊ विमानांवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या वर्चस्वामुळे हे स्पष्ट झाले आहे की, जर भारताला हवे असेल तर, आपण आपल्या इच्छेनुसार हल्ला करू शकतो. यानंतर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, भारताचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत असून, गरज पडल्यास पुढील कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज आहे.