श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…

श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…

Eknath Shinde Statement On Deputy CM Post To Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल लागून सातपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण? या प्रतिक्षेत जनता आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचा निकाल येवून जवळपास एक आठवडा झालाय. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत स्पष्टता आली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra CM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे.

भाजप नेत्यांनी शपथविधीबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी त्यांच्या मूळ दरे गावी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली होती. त्यानंतर आता आमची बैठक होईल. या बैठकीमध्ये राज्याचा हिताचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

‘किमान तीन मुलं असावीत’, अन्यथा….; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला खूप दिलंय. राज्यामध्ये लवकर चांगलं सरकार स्थापन व्हावं, ही जनतेची इच्छा आहे. विरोधक काय बोलतात याच्याशी काहीही घेणं-देणं नसल्याचं ते म्हणाले आहेत. महायुतीमध्ये कोणत्याही समन्वयाचा (Deputy CM Post To Shrikant Shinde) अभाव नाही. माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नसल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. भाजपने घेतलेल्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

बांग्लादेशात आणखी 2 हिंदू संतांना अटक, चिन्मय दासचे सचिवही बेपत्ता; इस्कॉन कोलकाता प्रवक्त्याचा मोठा दावा

राजकीय वर्तुळात श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, चर्चा सुरू आहेत. चर्चेतून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. त्यांना आम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही लोकांशी बांधिल आहोत. आमच्या मनामध्ये कोणतेही किंतु-परंतु नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुट्टी घेतलेली नव्हती. एका दिवसामध्ये आठ ते दहा सभा घेतल्या. त्यामुळे आराम करण्यासाठी मी गावाकडे आलो होतो. सत्ता स्थापन होताना गावी जायचे नाही का? असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube