दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस

दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस

Devendra Fadnavis Jalna Sabha : रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना साथ द्यायला हवी. मात्र, मला जालन्याबद्दल खात्री आहे की, ही जनता दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेत पाठवेल असा विश्वास फडवणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. ते जालना (Jalna Lok Sabha) येथे आयोजित सभेत बोलत होते.

 

मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार

मराठवाड्याचं चित्र आम्ही बदलणार. समृध्दी महामार्गामुळे मराठवाड्याचं चित्र बदलत आहे. येथे पश्चिमी वाहिन्यांच वाहून जाणार पाणी आणून आम्ही मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मराठवाड्यातील रस्त्यांच जाळही आम्ही निर्माण करू असंही आश्वासन फडणवीसांनी दिलं.

 

पावसाचं वातावरण निर्माण

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रीडचं काम सुरू आहे. तेही आम्ही पूर्ण करणार आहोत. परंतु, त्यासाठी तुम्हाला रावसाहेब दानवे यांच्या पाठिशी उभं राहाव लागेल असही फडवीस यावेळी म्हणाले आहेत. यावेळी पावसाचं वातावरण निर्माण झाल्याने फडणवीस यांनी भाषण आटोपत घेतलं.

 

सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात

रावसाहेब दानवे यांनी 1980 मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे 1990 व 1995 मध्ये ते विधान सभेवर निवडून आले. नंतर 1999, 2004, 2009, 2014 आणि  2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले आहेत. ते यावेळी सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज