मी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडूंना फोन केला नाही; पवारांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया

मी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडूंना फोन केला नाही; पवारांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया

Sharad Pawar : मी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना फोन केलेला नाही. मी फक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे आणि येच्युरी यांच्याशी चर्चा केली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, देशातील जनतेने धर्मांध आणि जातीपातीचं राजकारण नाकारलं आहे. तसंच, आम्ही 250 जागांच्याही पुढे जाऊ असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर उद्याच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेऊ असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावरही भाष्य केलं. या मतदारसंघातील लोक योग्य निर्णय घेतील असा विश्वास मला होता असंही पवार म्हणाले आहेत. तसंच, बारामती विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना लीड मोठं आहे असंही पवार म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज