NCP : ‘2004 चं गुपित फोडा; 5 गौप्यस्फोट करत तटकरेंची अजितदादांना साद

NCP : ‘2004 चं गुपित फोडा;  5 गौप्यस्फोट करत तटकरेंची अजितदादांना साद

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2017 मध्येच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं असतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का होऊ शकला नाही?, याचा खुलासा आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी करावा, अशी मागणी तटकरे यांनी केली. या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) उपस्थित होते.

त्यावेळी पक्षानं अजितदादांची बाजू घेतली नाही  

2004 साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं नाही याचं स्पष्टीकरण अजितदादा तुम्ही आता द्यायला हवं. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांनी आघाडी सरकार चांगलं चालवलं. परंतु पृथ्वीराज चव्हाण 2010 साली मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बदल झाला. अजित पवार यांच्यावर 2009 नंतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टीका सूरू झाली. त्यावेळीं पक्षाने तुमची बाजू घ्यायला हवी होती. परन्तु पक्षाने ती घेतली नाही याचं मला वाईट वाटलं, असे तटकरे म्हणाले.

Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार का? म्हणाले, आधी लोकसभेची निवडणूक नंतर

2017 मध्येच भाजप-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं 

कोणीतरी दावा करतं की मी अलिबागला एक बैठक घेतली होती मी त्यांना सांगतो अलिबागमध्ये जी बैठक झाली ती शरद पवार यांनी मला घ्यायला लावली होती. 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन झालं असतं. त्यावेळी याच हॉटेलमध्ये बैठक झाली होती. आज देखील त्याच हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. काय योगायोग असतात त्यावेळी मी अध्यक्ष होतो आजही अध्यक्ष आहे. आपण सत्तेत सहभागी झालो. एक महिना आपण थांबलो. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मला सांगितलं मंत्र्यांना घेऊन जा आणि शरद पवार यांची भेट घ्या. मी देखील जाऊन भेट घेतली.

पक्षाच्या जडणघडणीत अजितदादांचं योगदान 

मी ज्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर अजित पवार यांनी मला अध्यक्ष करावं असं सांगितलं. निवडणूक आयोगासमोर सांगितलं अजित पवार यांनी काहीचं केलं नाही. मला त्यांना सांगायचं आहे की अजित पवार यांचा पक्षाचा जडणघडणमध्ये मोठा हात आहे . वेगवेगळ्या कार्यक्रमात सांगितलं जातं 2019 सालची निवडणुक युतीला बहुमत देणारी होती. कौल अर्धा भाजप आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात जनतेने दिला होता. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकाराला पाठींबा दिला हे अघटीत होतं. पहाटे शपथविधी झाला तो का झाला हे अजित पवार यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. जे आता सोबत नाहीत ते देखील अजित पवार यांच्यासोबत होते.

Sunil Tatkare : पृथ्वीराज चव्हाणांना ‘राष्ट्रवादी’ विरोधाची ‘सुपारी’ सरकार पाडल्याच्या टीकेवर तटकरे भडकले

राष्ट्रवादी कुणाची यासाठी निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरू आहे. यावेळी अजितदादा भेकड असल्याचा सांगण्यात आलं. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आले असते का, असा सवाल तटकरे यांनी या शिबिरात केला. आयोगाची सुनावणी लांबली जातेय की लांबवली जातेय हे कळतंय आता 53 पैकी 43 आमदार आपल्यासोबत आहेत. मतदारसंघात जराही विचार न करता सर्व आमदार उभे राहिले हे महत्त्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube