‘किती हा विरोधाभास’; जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर

‘किती हा विरोधाभास’; जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर

Jayant Patil On PM Narendra Modi : किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी शरद पवार यांचे तोंडभरुन कोतुक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मोदी एका कार्यक्रमात बोलताना म्हणताहेत की, किक्रेटच्या दुनियेत मी आणि शरद पवार होतो. त्यामुळे आमची भेट व्हायची. यावेळी क्रिकट संदर्भात आमची १० मिनिट चर्चा झाली तर शरद पवार पाच-सहा मिनिट शेतकऱ्यांविषयीच बोलायचे. कोणताही विषय काढला की ते पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यायचे.

शरद पवार यांच्या डोक्यात गाव, शेतकरी आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान कसं आणता येईल याचाच विचार असायचा. शेतीमध्ये तंत्रज्ञान आणण्यासाठी ते आग्रही राहायचे. पोस्ट हार्वेस्टिंगबाबत ते जास्त विचार करायचे. आपण सर्व लोक ज्या पद्धतीने शेतीकडे पाहतो, त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून ते शेतीकडे पाहतात. त्यांची या गोष्टींकडे पाहण्याची वेगळी पद्धत होती, असं मोदी व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. त्याचवेळी मागच्या सात वर्षांत आमच्या सरकारने एमएसपीवर साडे तेरा लाख रुपयांच्या धान्याची खरेदी केली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

Nitesh Rane : सदावर्तेंची गाडी फोडणारे काल मातोश्रीवर होते; राणेंचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेत साईंची पूजा केली. त्यानंतर अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस हे देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.

दरम्यान, विविध विकासकामांचं लोकार्पण झाल्यानंतर शिर्डीत आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून थेट शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी कृषीमंत्री असताना काय केलं? असा सवाल उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube