“राज्यात 2014 ला भाजपचे सरकार आणण्यात पवारांचा सिंहाचा नाही तर, हत्तीचा वाटा”

“राज्यात 2014 ला  भाजपचे सरकार आणण्यात पवारांचा सिंहाचा नाही तर, हत्तीचा वाटा”

Prataprao Jadhav on Sharad Pawar for help BJP to establishment of power in Maharashtra : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे.2014 ला राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. असं ते म्हणाले. जाधव बुलढाण्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

2014 ला भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये पाठिंबा देणारे कोण होते? त्यावेळी त्यांनी काय कमिटमेंट केली होती? त्यामुळे 2014 ला राज्यात भाजपचे सरकार आणण्यामध्ये शरद पवार यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा होता. त्यावेळी त्यांना भाजप कसे चालत होतं? मात्र त्यांना आता भाजपचा तिटकरा का येत आहे. 2014 च नाही तर अशा अनेक वेळा शरद पवार यांनी कळत नकळतपणे भाजपची मदत केली आहे.त्यांच्या समर्थन केलं आहे. आता मात्र ते देशातील सर्वांत मोठा विरोधीपक्ष होण्यासाठी तसेच आपल्या पक्षाचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी भाजपचा तिरस्कार करत आहेत.

देश शोकसागरात बुडालेला असताना पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर, सामना’तून ठाकरे गटाचा वार

अनेकदा चर्चा होते की आपण सर्वांना सोबत घेतलं पाहीजे. मात्र, सर्वांना म्हणजे कुणाला? जे शिव, शाहू फुले आंबेडकरांना मानतात. यशवंतराव चव्हाण यांना मानतात त्या लोकांना आपण सोबत नक्की घेऊ. मात्र, संधासाधू भाजपसोबत कदापीही युती होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Pawar) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण भाजपसोबत जोरदार लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

मुरबाडच्या सिद्धगडावर दुर्दैवी घटना; नवी मुंबईच्या साईराजचा दरीत कोसळून मृत्यू

तसंच, यावेळी शरद पवार यांनी १९८० ची घटनाही सांगितली. ते म्हणाले, त्यावेळी राष्ट्रवादीचे ७० आमदार निवडून आले. ते मोठ यश होत. त्याच दरम्यान, मी काही कामानिमीत्त १० दिवसांसाठी बाहेर गेलो होतो. त्या दहा दिवसांत मागं चमत्कार घडला आणि पक्षाचे निवडणून आलेल्या ७० आमदारांमधून ६४ आमदार पक्षाला सोडून गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांचे कष्ट, जनतेने ठेवलेला विश्वास हे सगळ विसरून त्यांनी हे पाऊल उचललं होत. मात्र, मी या घटनेने खचलो नाही. लोकांशी संपर्क वाढवला. पक्षात अधिक लक्ष दिलं. नवे कार्यकर्ते उभा राहिले. त्यानंतर ५ वर्षांनी निवडणूक झाली आणि जे सोडून गेले त्यातील ९० टक्के लोक पराभूत झाले होते. त्यामुळं असे संकट येत असतात त्याला न घाबरता पुढं जायच असंत असंही पवार यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या