पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला
![पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/04/Rahul-Gandhi-And-Narendra-Modi.jpg)
Rahul Gandhi On PM Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आतापर्यंत देशात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. तर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) जोरदार प्रचार होताना दिसत आहे.
आज राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला करत मोदी आता घाबरले असून, स्टेजवरच काही दिवसांतच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील असा टोला त्यांनी लावला. राहुल गांधी आज कर्नाटकातील (Karnataka) विजयपुरा येथे काँग्रेस (Congress) उमेदवार एचआर अलागुर (HR Alagur) यांच्या प्रचारासाठी सभा घेत होते. या सभेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तास तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. ते कधी पाकिस्तान तर कधी चीनबद्दल बोलतात तर कधी कधी लोकांना थाळी वाजवायला आणि मोबाईलची फ्लॅश लाईट लावायला सांगतात. आता मोदी घाबरलेले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात ते स्टेजवरच डोळ्यातून अश्रू काढतील अशी घणाघात टीका राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना केली आहे.
आमदारांची वाढणार धाकधुक, मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, सर्व 288 जागांवर उमेदवार देणार
नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात देशातील गरिबांचा पैसा हिसकावून घेतला आहे. आज देशातील 40 टक्के संपत्ती केवळ एक टक्के लोकं नियंत्रित करत आहे, आम्ही सत्तेत आलो तर देशातील बेरोजगारी आणि महागाई दूर करून देशातील सर्वसामान्यांना दिलासा देऊ असं देखील राहुल गांधी या सभेत म्हणाले.
“उद्धव ठाकरेंचा रस्ता अडवणारा अजून जन्माला आला नाही”; विनायक राऊतांचा राणेंवर तिखट प्रहार