राणे केवळ भाजपची लाचारी करतात, पण आता भुंकणाऱ्यांचे दिवस…; विनायक राऊतांची जहरी टीका

  • Written By: Published:
राणे केवळ भाजपची लाचारी करतात, पण आता भुंकणाऱ्यांचे दिवस…; विनायक राऊतांची जहरी टीका

Vinayak Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सातत्याने भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. आज एका कार्यक्रमात बोलतांना त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली. कोंबडी चोराची पीस तुम्हीच काढली असं विधान करत ठाकरेंनी राणेंचं नाव न घेता त्यांना डिवचलं. तर आता कणकवलीतील सभेत बोलतांना खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut)राणेंवर टीकास्त्र डागलं. राणे केवळ भाजपची लाचारी करत असल्याची टीका राऊतांनी केली.

‘हा नाऱ्या पदासाठी दारोदारी भटकत फिरणार’; बाळासाहेबांनी दिलेला शाप जाधवांनी सांगितला… 

आज कणकवलीत ठाकरे गटाची सभा झाली. या सभेत बोलतांना विनायक राऊतांनी राणेंवर निशाणा साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, अवघ्या २४ तासाच्या आत ही सभा पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली आहे. त्यामुळं काहींच्या पोटात पोटशुळ उठणार यात शंका नाही. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेर्यंत भाजपने भुंकण्यासाठी जे काही पाळलेले प्राणी आहेत, त्यातला एक प्राणी कणकवलीत राहतो. देशाच्या संसदेत आम्ही खासदार म्हणून प्रश्न विचारतो, त्यावर मंत्री उत्तरं देत असतात. पण, आम्हाला लाज वाटते की, कोकणाचं प्रतिनिधित्व करून केंद्रात मंत्रीपद भुषवत असलेल्यांना उत्तर देतांना लोकसभेच्या अध्यक्षांना सातत्याने हस्तक्षेप करावा लागतो. त्यांच्या मंत्रीपदाचा कोकणासाठी, सिंधुदुर्गसाठी काहीही उपयोग नाही, ते केवळ भाजपची लाचारी करत करत असल्याची टीका राऊतांनी केली.

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अन् दिल्लावाल्यांना महाराष्ट्राचं पाणी…; उद्धव ठाकरेंचा इशारा

पुढं बोलतांना राऊत म्हणाले की, यांच्या मंत्रिपदाचा काहीच उपयोग नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते फक्त उध्दव ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे काही करत नाही. पण, आता भुंकणाऱ्यांचे दिवस थोडेच राहिले. लवकरच निवडणुका आहेत, असा इशारा राऊतांना दिला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाहीत. यावरही राऊतांना भाष्य केलं. भाजप निवडणुका घेण्याचं धारिष्ट करत नाही. प्रशासकांना नेमून त्यांच्यामार्फत जेवढं ओरबडून घेता येईल, तितकं ओरबडून घेण्याचं काम भाजप करत आहे, असंही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार असतांना या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं. पण, नारायण राणेंच्या महाविद्यालयातील प्रवेश कमी होतील म्हणून त्यांनी शासकीय महाविद्यालयाच्या कामात अडथळे आणले. त्यामुळं या हैवानांना गाडून टाका, गद्दारांना गाडून टाका, असं आवाहनही राऊतांनी उपस्थितांना केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज