‘हा नाऱ्या पदासाठी दारोदारी भटकत फिरणार’; बाळासाहेबांनी दिलेला शाप जाधवांनी सांगितला…

‘हा नाऱ्या पदासाठी दारोदारी भटकत फिरणार’; बाळासाहेबांनी दिलेला शाप जाधवांनी सांगितला…

Bhaskar Jadhav On Narayan Rane : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या सभेवर सभा घेत असल्याचं दिसतंय. अशातच सिंधुदूर्गमधील कणकवलीत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत भाषणादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नाऱ्या (नारायण राणे) हा पदासाठी दारोदारी भटकत फिरणार असल्याचा शाप स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिला असल्याचा किस्साच भास्कर जाधव यांनी सांगितला आहे.

अख्खी इंडस्ट्री पूनमच्या विरोधात असताना दिग्दर्शकाने दिला पाठिंबा, अन् स्वत:च झाला ट्रोल

भास्कर जाधव म्हणाले, मी पूर्वीही कोंबडीवरच बोललो आहे. त्यानंतर लघु मद्य आणि सूक्ष्मवरही बोललो आहे. नारायण राणेबद्दल मला बाळासाहेबांनी एकदा फोन करुन म्हणाले, अरे भास्कर ह्या भ… नाऱ्यावर मी काय अन्याय केला रे… असा सवाल केला असल्याचं भास्कर जाधवांनी सांगितला. त्यावेळी मुंबईतील घाटलाव्हिलामधील या कोंबडी विक्रेत्याला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं होतं, पण तोच आज गरळ ओकत आहे. त्यावर बाळासाहेब म्हणाले, तो माझ्यावर उद्धववर गरळ ओकतोयं पण मी आज सांगतो हा नाऱ्या (नारायण राणे) पदासाठी दारोदारी भटकत फिरेल हा माझा शाप आहे, असा शाप बाळासाहेबांनी दिला असल्याचं भास्कर यांनी सांगितलं आहे.

जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवारसारखा असता; पडळकरांची घणाघाती टीका

तसेच बाळासाहेब ठाकरे हे एक सिद्ध पुरुष होते. त्यांनी त्यावेळी केलेलं भाकीत आज खरं झालं आहे. हे लोकं आज दारोदारी भीक मागत फिरत आहेत. या सिंधुदूर्गग जिल्ह्यात अनेकजण महापौर, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. एक मनोहर जोशी आणि दुसरा म्हणजे हा नागोबा असा उल्लेख भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचा केला आहे.

मोठी बातमी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर; PM मोदींनी केली घोषणा

ठाकरे घराण्यांच्या चार चार पिढ्यांची अनेकांना मोठं केलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून ते उद्या आदित्य ठाकरेंपर्यंत पण कुठलंही पद ठाकरे घराण्याने घेतलं नाही. एकदाच फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुमच्या पोटात कळ उठली आहे, आरोप आणि टीका करीत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. दरम्यान, मला शिवसेनेचा शिवसैनिकचम मुख्यमंत्री करायचा, असा उद्धव ठाकरेंचा आजही पवित्रा आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना गादीवरुन खाली ओढलं, त्या गादीवर उद्धव ठाकरेंना बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निश्चय कोकणवासियांनी करावा, असं आवाहन भास्कर जाधव यांनी यावेळी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube