माळेगावसाठी मु्ख्यमंत्र्यांनी केली होती मध्यस्थी, शरद पवार गटाचाही प्रस्ताव; अजितदादांचा गौप्यस्फोट!

Ajit Pawar Latest News : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी एकहाती (Ajit Pawar) विजय मिळवला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलने तब्बल 20 जागा जिंकल्या. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) पॅनलचा अक्षरशः सुपडा साफ झाला. या विजयानंतर अजित पवार आज माळेगावात आले होते. येथे आयोजित आभार सभेत त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) देखील मध्यस्थी केली होती असा गौप्यस्फोट अजितदादांनी भाषणात केला.
माळेगावच्या निवडणुकीबद्दल मी काहीही बोललेलो नव्हतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुम्ही मोठ्या पदावर आहात. महायुतीतही आपण एकत्र आहोत. त्यामुळे तुम्हाला थोडं समजून घ्यावं लागेल. त्यानंतर मी शांत राहिलो होतो त्यानंतर हा मुद्दा पुढे आला होता, असे अजित पवार आभार सभेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
माळेगाव कारखान्याचे कारभारी अजितदादा! 21 पैकी 20 जागा जिंकल्या, शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ
शरद पवार गटाचाही प्रस्ताव होता
या निवडणुकीत शरद पवार गटाकडूनही प्रस्ताव मिळाला होता. पक्षाचे तालु्काध्यक्ष एसएन जगताप माझ्याकडे आले होते. आम्हाला सहा जागा द्या असे म्हणाले होते. त्यावर मी त्यांना दोन जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. एक जागा स्वीकृत संचालक म्हणून देतो असेही सांगितले होते. त्यांनीही याला संमती दर्शवली होती. नंतर मी राजवर्धन शिंदे यांना सूचना केली होती. मात्र त्यांनी हे जमणार नाही असे सांगितले होते.
नीलकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या
अजितदादांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून चेअरमनपदासाठी आपले नाव जाहीर केले होते. त्यामुळे या निवडणुकीला मोठं महत्व प्राप्त झालं होतं. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान झाले. अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलला चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलने चांगलीच झुंज दिली. दरम्यान, 25 जूनला निकाल जाहीर झाला. यात नीलकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या.