स्थानिक स्वराज्य निवडणुका कधी लागणार? अजितदादांनी दिले संकेत…

Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही वेळी लागण्याची शक्यता असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलंय. पावसाळ्याचे महिने संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असं निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
“मी निष्पाप तरीही माझ्यावर कारवाई, आता मनपा निवडणुकीत..”, भाजपात येताच बडगुजरांनी ठाकरेंना ललकारलं
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. पावसाचे महिने संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. 2022सालापासून निवडणुका होणार होत्या, पण आता 2025 सुरु आहे अद्यापही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात निवडणुका जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
तसेच एससी, एसटी प्रवर्गातील नागरिक अद्यापही वंचित आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम केलं पाहिजे. यासोबतच ओबीसींनाही प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे त्यासाठी एवढा काळ गेला आहे. 2022 ला निवडणुका होणार होत्या पण आता 2025 ला होणार आहेतय लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला याचा फटका बसलायं. तीन वर्षे संधी न मिळाल्याने गॅप पडला. निवडणुका लागतील म्हणून जे तयारी करत होते त्यांनी वारेमाप खर्च केला कार्यक्रम केले पण निवडणुका लागल्या नाहीत, आजपासून कामाला लागा. निवडणुकीत आरक्षण कसे निघतील ते सांगता येत नाही पण तुम्ही प्रभागात आपला संपर्क वाढवण्याचं काम करा , चार जणांचा प्रभाग म्हणजेच दोन पुरुष महिला असा होऊ शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, मेष आणि वृषभ राशींना मंगळवारी आनंदाची बातमी मिळेल
PM मोदींचा करिश्मा पाहुन जनतेचा पाठिंबा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहुन देशातल्या लोकांनी पाठिंबा दिला. मी मी म्हणणारे लोकं पराभूत झाले आहेत. काही जणांना वेगळ्या पक्षात जावं लागलं पण ते शरीराने तिकडं असले तरीही मनाने आपल्याकडे होते. बारामती लोकसभेत आपल्याला पराभव स्विकारावा लागला. कुठेतरी आमचा मानसन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
स्वत:चा जीव सांभाळून पावसात भिजण्याचा आनंद लुटा…
कुंडमळा येथील दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला. तुम्ही तिकडं कसे गेले असं विचारलं तर ते म्हणाले अर्धा तासाच्या अंतरावर आम्ही तिथं फिरायला गेलो पण तिथं अक्षरश पूल पडला
गर्दी झाली होती पाणी वाहत होतं, कारण नसताना होत्याचं नव्हतं झालं. आता नागरिकांना विनंती, धरणे, धबधबे नद्यांचा परिसर डोंगरदऱ्यात फिरणे पावसात भिजण्याचा आनंद असतो पण स्वतचा जीव सांभाळून. विमान दुर्घटना आणि कुंडमाळ दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना चिरशांत मिळो, असं अजित पवार म्हणाले आहेत.