मुंबई, पुणे अन् कोकणात आजही मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला आहे. पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आजही या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे रायगड जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांनी (Heavy Rainfall) सुट्टी देण्यात आली आहे.
छत्री घेवूनच बाहेर पडा! आज मुसळधार कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
या जिल्ह्यांना ऑरेंज अन् यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसगह रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यंना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात आजपासून काही दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे. या दिवसांत ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
16 ते 17 जुलै या दोन दिवसांत उष्ण आणि दमट हवामान काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. 18 जुलै रोजी देखील अशीच परिस्थिती राहिल असा अंदाज आहे. 19 आणि 20 जुलै या दोन दिवसांत ढगाळ हवामान आणि थंड वातावरण राहिल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून, बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवसही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
सावधान! मुंबई-पुण्यात ‘कोसळ’धार, ‘या’ 13 जिल्ह्यांत अतिमुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट