सावधान! मुंबई-पुण्यात ‘कोसळ’धार, ‘या’ 13 जिल्ह्यांत अतिमुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

सावधान! मुंबई-पुण्यात ‘कोसळ’धार, ‘या’ 13 जिल्ह्यांत अतिमुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Monsoon : राज्यात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती (Maharashtra Monsoon) घेतली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पण यातच आता एक दिलासा देणारी बातमी आली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मान्सूनचे जोरदार (Rain Alert) कमबॅक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अलर्ट जारी केला आहे. मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. राज्यात सर्वदूर झालेल्या या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात साधारण 15 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. यावेळी मात्र मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, मुसळधार पावसानंतर मंत्री विखे ॲक्शन मोडमध्ये

मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता. परंतु, जून महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होईल. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एसडी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जूनपासून कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपुरात उकाडा कायम 

विदर्भात मात्र अनेक ठिकाणी उष्णता कायम आहे. नागपूरचा पारा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी शहरात 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जून महिन्याचे पहिले दहा दिवस उलटून गेल्यानंतरही शहरातील उकाडा कमी झालेला नाही. सोमवारनंतर मंगळवारी सुद्धा राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. शहरातील उष्णतेत घट होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. परंतु, येत्या दोन दिवसांत राज्यांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे यानंतर कदाचित परिस्थिती बदलेल आणि पावसाचे वातावरण होईल अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा, हवामान विभागाचा अंदाज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube