- Home »
- Shivsena
Shivsena
मुख्यमंत्र्यांनी फोन करुनही भुसेंनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही, ते उद्धटपणे माझ्याशी…; थोरवेंनी सगळंच काढलं
Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागणार? राज्य सरकारकडून प्रभाग रचनेत पुन्हा बदल
मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व 28 महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काल (29 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाने (state government) मान्यता दिली होती. त्यानंतर आज (1 मार्च) विधिमंडळातही याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता आहे. (state […]
दादा भुसे अन् महेंद्र थोरवे भिडले! शिंदे गटाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा
मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
राज्यातील 40 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित; लोकसभेपूर्वी शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा
Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता […]
जागावाटपावरून महायुतीत खटके! शिवसेनाला २३ जागा मिळाव्यात, अन् धनुष्यबाण चिन्हावरच…; संजय मंडलिकांचे विधान
Sanjay Mandalik : कोल्हापूरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) जाणार असल्यचाची चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतानाच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचं ते म्हणाले. कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या चिन्हावरही लढावे लागणार असल्याचीही चर्चा आहे. […]
अमरावती मतदारसंघावर अडसूळांचा दावा, राणांवर टीकास्त्र, ‘राणा दांम्पत्य म्हणजे, चलती का नाम गाडी…’
Abhishek Adsool on Ravi Rana : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे जोरात वाहत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज अमरावती लोकसभेवर नवनीत राणांचा दावा ठोकला. यावेळी त्यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao […]
महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जवळपास अंतिम केली आहेत. यातील 13 नावांची संभाव्य यादी ‘लेट्सअप मराठी’च्या हाती लागली आहे. यात काही मतदारसंघांमध्ये अत्यंत धक्कादायक नावे समोर येत आहेत. याठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत भाजप (BJP) नवख्यांना उमेदवारी देण्याच्या तयारी असल्याचे दिसून येते. (BJP-Shiv Sena-Nationalist Congress alliance has finalized the […]
महायुती 45 जागा जिंकण्याचा अंदाज : शिंदे-फडणवीस-पवारांच्या डावपेचांपुढे ‘मविआ’ला गाशा गुंडाळावा लागणार
Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रातही महायुतीने 45+ चा नारा दिला आहे. अशात आता महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा 45 जागांवर विजय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये हा अंदाज बांधण्यात आला आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही […]
नाशिकमध्ये हेमंत गोडसे सेफ : CM शिंदेंचा निरोप न आल्याने शांतिगिरी महाराजांनी निवडली वेगळी वाट
नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. […]
