Ahilyanagar : वाद विकोपाला! ८ वीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला संपवलं

Ahilyanagar  : वाद विकोपाला! ८ वीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला संपवलं

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात (Sitaram Sarada School) एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केल्याच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. चाकूने केलेल्या हल्ल्यात गंभीर जमखी विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात (Ahilyanagar Civil Hospital) उपचारासाठी नेत असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी अधिकारी ठार, TTP च्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ! 

अफान उर्फ मुस्तकिम तन्वीर शेख असं मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत होता. तर त्याचा खून करणारा विद्यार्थी त्याच विद्यालयात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही शालेय विद्यार्थी अल्पवयीन आहेत. यातील एका विद्यार्थी आठवीच्या वर्गात शिकत होता. तर दुसरा दहावीत शिकत होता.
बुधवारी दुपारी दोघेही शाळेत असताना त्यांच्यात वाद झाला. शाळेत मधल्या सुट्टीत त्यांच्यात झालेला वाद इतका वाढला की एकाने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीत शिकणार अफान मुस्तकीर शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणेकरांचा प्रवास होणार फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी, कसा असणार मार्ग ? 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खूनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, सीताराम सारडा ही शहरातील एक नावाजलेली शाळा असून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही काळ याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube