अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडिल रवींद्र बाबुराव पाटील (Ravindra Patil) यांचे खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. गौतमीचे वडिल हे तीन दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस स्थितीत आढळून आले होते. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बेवारस व्यक्ती ही गौतमी पाटील हिचे वडिल असल्याचे समोर […]
Pankaja Munde : दोन महिन्याच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवशक्ती यात्रा काढली आहे. ही यात्रा धार्मिक असल्याचे पंकजा मुंडे या सांगत आहेत. या यात्रेला मुंडे समर्थकही गर्दी करत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे. नाशिकमध्ये यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार […]
मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आहे. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. आता भाजपचे नेतेही फडणवीस यांची बाजू घेण्यासाठी शरद पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरमधील गोवारी घटनेचा आठवण शरद पवारांनी करून दिली […]
Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवरून जोरदार राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणीही पवारांनी केली आहे. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांना काही सवाल उपस्थित केले आहेत. […]
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांनी एकमेंकावर वार करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट गृहमंत्री […]
Maratha Reservation Agitation : जालन्यातील सराटी येथील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. तर सराटी येथे आता राजकीय नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानेच हा लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधक बोट दाखवू लागले आहेत. यावर आता […]
जालनाः मराठा आरक्षणाची मागणीसाठी बसलेल्या आंदोलकर्त्यांवर पोलिसांची लाठीचार्ज केला आहे. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यावरून आता विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दोषी धरले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांनी सरकारवर तोफ डागत फडणवीसांना घेरले […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक दोन दिवस मुंबईत पार पडली. या आघाडीचे सर्वच घटक पक्षांना बैठकीला बोलविण्यात आले होते. सर्व पक्षांचे प्रमुख नेते हजर होते. परंतु या बैठकीला एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कपिल सिब्बलही उपस्थित राहिले. कपिल सिब्बलांना (MP Kapil Sibal) निमंत्रण नसतानाही ते बैठकीला आले. त्यावरून काँग्रेसचे नेते चिडले. त्यात सर्वाधिक […]
जालना : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक […]
मुंबईः इंडिया(INDIA)आघाडीची बैठक दुसऱ्या दिवशी मुंबईत सुरू आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. आता या बैठकीत तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तेरा जणांची समिती स्थापन करताना आगामी निवडणुकीचा विचार करून प्रादेशिक समतोल राखण्यात आल्याचे दिसून येत आहे. या समितीत महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत या दोघांना […]