- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
वादग्रस्त वक्तव्ये अंगलट! अमोल मिटकरींची सहा महिन्यातच ‘मुख्य प्रवक्तेपदावरुन’ उलचबांगडी
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती केली आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर […]
-
“फडणवीस साहेब, तुमच्यासाठी ‘एक’ कडू गोळी ‘रोज’ गिळतोय” : रणजीतसिंहांनी खदखद बोलून दाखविली!
फलटण : भविष्यात माढा लोकसभा (Madha) मतदारसंघासाठी काही कठोर निर्णय घ्यायची वेळ आल्यास नक्की घ्या, हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) तुमच्या पाठीशी उभा आहे. या फलटण (Phaltan) तालुक्यातून तुम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला 70 हजारांचे लीड देऊ, तुम्ही जो दगड उभा कराल त्याला शेंदूर फासण्याचे काम करु. अशा कितीही कडू गोळ्या गिळण्याची तयारी आहे. […]
-
सीमाभागातील तुमची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना बंद करा! सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राला दरडावले
बैलहोंगल : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (Karnataka Chief Minister Siddaramaiah has taken issue with Maharashtra implementing its Mahatma […]
-
जरांगे मुंबईला येण्यासाठी निघण्यापू्र्वीच शिंदे सरकारचे मोठे पाऊल : अध्यादेशाचा अंतिम मसुदा तयार
मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
-
भाजपकडे आता स्वतःचे उमेदवारच नाहीत, बावनकुळेही काँग्रेसचेच प्रोडक्ट : पटोलेंचा निशाणा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे दिसून आल्यानेच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे (BJP) सध्या नेते नाहीत व स्वतःचे उमेदवारही नाहीत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेसुद्धा काँग्रेसमध्येच (Congress) तयार झालेले प्रोडक्ट आहेत, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
-
देवरा शिवसेनेत येऊन फसले? भाजपचा चार मतदारसंघांवर दावा, ‘दक्षिण मुंबई’साठी खास आग्रही
मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांच्या जागावाटपावरुन भाजप-शिवसेनेत वाद उभा राहण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबईतील चौथ्या मतदारसंघावरही दावा ठोकला आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य या सोबतच शिवसेनेच्या ताब्यात असलेला दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा सांगितला आहे. इथून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. (Along with […]
-
Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता
Who is Dhangekar? या चंद्रकांतदादांच्या एका प्रश्नाने वारे फिरवलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली. भाजपच्या हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा 10 हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इथून विजय मिळविला. आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर तयारीला लागले आहेत. त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच […]
-
साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ : ‘मोलॅसिस निर्यातीवर’ केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पुणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोलॅसिस अर्थात मळीच्या निर्यातीवर 50 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. नुकताच याबाबचा आदेश काढण्यात आला असून गुरुवारपासून (18 जानेवारी) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या साखर हंगामावर होऊन मोलॅसिसचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. शिवाय इथेनॉल निर्मितीही घटण्याची चिन्हे […]
-
430 कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप : अडचणीत आलेल्या अभिजीत पाटलांचे केंद्राकडे बोट
पंढरपूर : राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. […]
-
हातकणंगलेत ठाकरे-पाटील ‘शेट्टींसाठी’ आग्रही… पण त्यांनी तर 2019 चा धसका घेतलाय!
एखादे लग्न जवळपास ठरते. सगळ्या गोष्टी पक्क्या होतात. पण लग्नावेळी नवरदेवच ऐनवेळी म्हणतो मला हे लग्नच करायचे नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांची जी दयनीय अवस्था होत असावी तशी अवस्था सध्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालीय. याचे कारणही तसेच आहे. (Raju Shetty […]










