Ind Pak War : ‘…दे दिया सिंदूर’, अखेर बिग बींनी मौन सोडले! पहलगाम हल्ल्याच्या 19 दिवसांनंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट

Ind Pak War :  ‘…दे दिया सिंदूर’, अखेर बिग बींनी मौन सोडले! पहलगाम हल्ल्याच्या 19 दिवसांनंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट

Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव आहे. यावर आता अमिताभ बच्चन यांनी (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर पोस्ट केली.

या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. तथापि, मेगास्टार अमिताभ बच्चन मौन ठेवून होते. ज्यावर सगळेच प्रश्न उपस्थित करत होते. परंतु पहलगाम हल्ल्याच्या 19 दिवसांनंतर अमिताभ बच्चन पहलगाम हल्ल्यावर व्यक्त झाले (India Pakistan Tension) आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय. त्यांनी प्रथम फेसबुकवर आणि नंतर एक्सवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी भाग्यशाली! घरात पैसाच-पैसा येणार, वाचा आजचे राशीभविष्य

बिग बींनी अखेर मौन सोडले

पहलगाम हल्ल्यानंतर जवळजवळ 20 दिवसांनी आणि ऑपरेशन सिंदूरच्या जवळजवळ (India Pakistan Tension) पाच दिवसांनी, अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. या प्रकरणात, बिग बींनी पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये सैन्याला सलाम केला आहे आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. या पोस्टमध्ये बिग बींनी त्यांच्या बाबूजी म्हणजेच हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळींचाही उल्लेख केला आहे.

“पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं घोर उल्लंघन; कठोर कारवाई करा”, केंद्र सरकारचे निर्देश

पोस्टमध्ये, बिग बी यांनी पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माबद्दल विचारणा केल्याच्या आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याच्या घटनेचा उल्लेख केला आणि लिहिले की, “सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पत्नी पत्नीला त्या राक्षसाने बाहेर ओढले, पतीला नग्न केले आणि धर्म विचारल्यानंतर त्याला गोळ्या घालण्यास सुरुवात केली. पत्नी गुडघे टेकून रडत असतानाही आणि पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही. त्या राक्षसाने तिच्या पतीला अतिशय क्रूरपणे गोळी मारली, ज्यामुळे पत्नी विधवा झाली.

जय हिंद! तू कधीच थांबणार नाहीस, तू कधीही मागे वळणार नाहीस, तू कधीही झुकणार नाहीस. शपथ घे, अग्निपथ असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आणि लष्कराचे कौतुक केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube