नमित मल्होत्रांच्या रामायणम्’चा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ, चाहत्यांकडून भरभरून कौतुक

Ramayanam ‘रामायण: पार्ट १’ दिवाळी २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Ramayanam

Trailer of ‘Ramayanam’ released; creates buzz on social media receives immense praise from fans : नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि नमित मल्होत्रांच्या प्राइम फोकस स्टुडिओज तसेच आठ वेळा ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG यांच्या निर्मितीत, यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने तयार झालेला ‘रामायण: पार्ट १’ दिवाळी २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जागतिक वितरण सोनी पिक्चर्स करणार असून उत्तर भारतातील वितरण धर्मा प्रोडक्शन्सकडे असेल.

‘रक्षाने राजीनामा द्यावा, हा फालतूपणा चालणार नाही’…विजय चौधरी अन् महाजनांची कथित ऑडिओ क्लिप!

३० जुलै २०२६: नमित मल्होत्रांच्या ‘रामायण: पार्ट १’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून त्याने जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा ट्रेलर ३० जुलै २०२६ रोजी सकाळी हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’विषयी

दूरदृष्टी असलेले निर्माता आणि चित्रपटकार नमित मल्होत्रा घेऊन येत आहेत ‘रामायण: पार्ट १’, जी जगातील सर्वात प्राचीन आणि प्रेरणादायी महाकाव्यांपैकी एका महाकाव्यावर आधारित दोन भागांतील भव्य सिनेमाई प्रस्तुती आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून तीनही लोकांचे संचालन त्रिदेव करतात — ब्रह्मा, जे सृष्टीची निर्मिती करतात; विष्णू, जे तिचे पालन करतात; आणि शिव, जे परिवर्तनाचे प्रतीक आहेत. जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये असंतुलन वाढू लागते, तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार धारण करून संतुलन प्रस्थापित करतात.

भाजप नेत्यांची महिलांविषयीची भाषा वेशीवर टांगणारी…कथित ऑडिओ क्लिप शेअर करीत रोहित पवारांचा निशाणा

यावेळी भगवान विष्णू राम (रणबीर कपूर) यांच्या रूपात जन्म घेतात. त्यांचे ध्येय धर्म आणि संतुलनाची स्थापना करणे आहे. त्यांच्या समोर उभा आहे रावण (यश) — अत्यंत शक्तिशाली, विद्वान, अजिंक्य आणि अमर राक्षसराज, ज्याला स्वतः त्रिदेवांचे वरदान लाभले आहे आणि ज्याचा अहंकार व सूड संपूर्ण विश्वाला संकटात टाकू शकतो.

ब्रेकिंग : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

आपल्या खऱ्या उद्देशापासून अनभिज्ञ असलेले राम अयोध्येचे सर्वात प्रिय युवराज आहेत आणि धर्माचे पालन करणारे आदर्श पुरुष आहेत. ते पत्नी सीता (साई पल्लवी) आणि भाऊ लक्ष्मण (रवी दुबे) यांच्यासह सन्मानपूर्वक जीवन जगू इच्छितात; परंतु नियती त्यांना वनवासाकडे घेऊन जाते. हाच वनवास पुढे राम आणि रावण यांच्यातील त्या महासंग्रामाची पायाभरणी करतो, जो देव आणि मानवांच्या भवितव्याचा निर्णय घेणार असतो.

दिग्गज कलाकारांचा संगम

नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’मध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी यांसारखे अनुभवी चित्रपटकार सहभागी झाले आहेत. दंगल सारख्या चित्रपटांमुळे भारतासह चीनमध्येही विक्रम प्रस्थापित करणारी त्यांची कथा सांगण्याची शैली या चित्रपटाची मोठी ताकद मानली जात आहे.

चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत :

* अरुण गोविल— राजा दशरथ

* कैकयी – लारा दत्ता

* अजिंक्य देव— ऋषी विश्वामित्र

* कुणाल कपूर— भगवान इंद्र

* रकुल प्रीत सिंग — शूर्पणखा

* रवी दुबे— लक्ष्मण

या भव्य कलाकारसमूहाचे नेतृत्व रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत करत आहेत. साई पल्लवी माता सीता यांच्या भूमिकेत असून पॅन इंडिया सुपरस्टार रॉकिंग स्टार यश, जे या चित्रपटाचे सहनिर्मातेही आहेत, रावणाची प्रभावी भूमिका साकारत आहेत.

जागतिक दर्जाचे लेखन आणि संगीत

चित्रपटाची पटकथा पुरस्कारविजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. संगीताची धुरा ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि
ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिभांचा हा सर्वात मोठ्या सहकार्यांपैकी एक मानला जात आहे. नमित मल्होत्रा म्हणाले, “रामायण ही केवळ महान महागाथा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी दशहरा आणि दिवाळी आपल्याला प्रकाशाचा अंधारावर आणि धर्माचा अधर्मावर विजय स्मरण करून देतात. हजारो वर्षांनंतरही लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या कथा फार थोड्या आहेत. रामायण त्यापैकीच एक आहे.

ब्रेकिंग : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

जागतिक चित्रपटसृष्टीत काम करताना मला नेहमी वाटत आले आहे की भारताच्या महान कथा जगासमोर त्यांच्या योग्य त्या भव्यतेने मांडल्या गेल्या पाहिजेत. आज आपल्याकडे कला, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि तीव्र जिद्द आहे, ज्यामुळे आपण ही सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचवू शकतो. ही केवळ एका चित्रपटाची सुरुवात नाही; तर भारताची सांस्कृतिक परंपरा जगासमोर मांडण्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”

खासदार पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा!

नितेश तिवारी म्हणाले, “रामायण ही जगातील सर्वात महान कथांपैकी एक आहे. तिचे वैभव केवळ तिच्या व्यापकतेत नाही, तर ती ज्या शाश्वत मूल्यांचे प्रतिनिधित्व करते त्यात आहे. दिग्दर्शक म्हणून मला ती सार्वत्रिक बनवण्याची गरज वाटली नाही; कारण ती आधीपासूनच संपूर्ण मानवजातीची कथा आहे. लेखन, अभिनय, प्रोडक्शन डिझाइन, संगीत, दृश्य प्रभाव आणि पडद्यावरील प्रत्येक दृश्य — प्रत्येक निर्णय आम्ही एका विचाराने घेतला: या महान परंपरेचा संपूर्ण आदर राखणे आणि सर्वोच्च सिनेमाई गुणवत्तेसह ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे.

Tukaram Mundhe : दोन शिफ्ट, सुट्टी रद्द अन् वाढीव वेळ काम…मुंढेंच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच लिहिला!

जगातील सर्वोत्तम कलाकार, तंत्रज्ञ आणि कथाकारांसोबत काम करून हे स्वप्न साकार करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. जगभरातील प्रेक्षकांनी रामायण मध्ये केवळ तिचे भव्य रूप नव्हे, तर तिच्या भावना, मानवी मूल्ये आणि हजारो वर्षे जिवंत राहिलेला तिचा आत्माही अनुभवावा, हीच माझी अपेक्षा आहे.”

follow us