नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलेय. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी […]
नागपूर : महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुन्हा एकदा केला. याला उत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली पाहिजेत. त्यातून सीमाभागातील मराठी […]
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बंद असल्याने जवळपास 55 मिनिटं सभागृह बंद राहिल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना वाट मोकळी करण्यासाठी कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणामुळे सभागृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांची वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. तर अशा पद्धतीने सभागृह बंद राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत […]