PM Modi : भारत-नेपाळ संबंधांवर मोदींचे मोठे विधान; म्हणाले आता….

PM Modi : भारत-नेपाळ संबंधांवर मोदींचे मोठे विधान; म्हणाले आता….

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी गुरुवारी दुपारी सोनौली सीमेजवळील केवतालिया गावाजवळ आणि नेपाळमधील भैरहवा येथे बांधल्या जाणार्‍या एकात्मिक चेक पोस्टची (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) आभासी पायाभरणी केली. सोनौलीजवळील बांधकाम सुरू असलेल्या संकुलात आयोजित कार्यक्रमात त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत दोन्ही देशांदरम्यान चांगला संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सीमा आमच्यासाठी अडथळा बनू नये, या दिशेने पावले उचलली आहेत. आम्ही भारत आणि नेपाळमध्ये असे संपर्क प्रस्थापित करू की आमच्या सीमा आमच्यामध्ये अडथळे बनणार नाहीत. सामायिक नद्यांवर पूल बांधणे, नेपाळमधून भारताला वीज निर्यात करणे यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे, अशी माहिती मोदींनी दिली.

गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार?

गेल्या नऊ वर्षांत आपण अनेक यश संपादन केले आहे. आज आम्ही आमची भागीदारी सुपरहिट करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नऊ वर्षांत भारताला नेपाळपेक्षा सरस करण्यासाठी आम्ही अनेक कामगिरी केली आहे. बीरगंज येथे पहिले आयसीपी बनवण्यात आले. सीमेवर पहिली पेट्रोलियम पाइपलाइन, रेल्वे लाईन, ट्रान्समिशन सुरू करण्याच्या दिशेनेही काम सुरू झाले आहे. नेपाळमधून 450 मेगावॅट वीज निर्यात करत आहे, असे मोदी म्हणाले.

वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी; गॅसच्या दरात मोठी घट

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड म्हणाले की, भारत आणि नेपाळमधील संपर्क वाढवण्यासाठी संयुक्त काम केले जात आहे. दोन्ही देशांमधील सीमावाद चर्चेतून सोडवला जाईल. भारताने नेपाळला शेतीसह सर्वच क्षेत्रात मदत केली आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube