पद्म पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, भिकल्या धिंडा, श्रीरंग लाड, रोहित शर्माला पद्मश्री
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी 113 व्यक्तींना पद्मश्री प्रदान केले जाणार आहेत.
केंद्र सरकारने आज रविवार (दि. 25 जानेवारी २०२६) रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. (Election) कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर, पालघरच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अती दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारर जाहीर झाला आहे. आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्यसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच क्रिकेटर रोहित शर्माला याला पद्मश्री जाहीर झालाय. 113 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पाच जणांना पद्मविभूषण आणि 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत.
कर्नाटकच्या अंके गौडा आणि महाराष्ट्राच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे भागवदास रायकवार आणि जम्मू-काश्मीरचे ब्रिजलाल भट यांना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. छत्तीसगडचे बुद्री थाती आणि ओडिशाचे चरण हेम्ब्रम, उत्तर प्रदेशचे चिरंजी लाल यादव आणि गुजरातचे धर्मलाल चुन्नीलाल पंड्या हे देखील याच श्रेणीत आहेत.
मामुली शब्द विलासरावांना भोवला?, 1995 च्या निवडणुकीत करावा लागला होता पराभवाचा सामना
केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दरम्यान, सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.
पद्म विभूषण
धर्मेंद्र सिंह देओल
केटी थॉमसन
एन राजम
पी नारायण
व्ही एस अच्युतानंदन
पद्मभूषण पुरस्कार
अलका याज्ञिक
भगतसिंग कोश्यारी
कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी
मामूट्टी
डॉ. नोरी दत्तात्रेयडू
पियुष पांडे
एस.के.एम. मैलानंदन
शतावधानी आर.गणेश
उदय कोटक
व्ही.के. मल्होत्रा
वेल्लापल्ली नटेसन
विजय अमृतराज
शिबू सोरेन
पद्मश्री पुरस्कार
भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
चरण हेमब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)
रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)
अंके गौडा (कर्नाटक)
आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मांडलेवाला (गुजरात)
आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
युनाम जात्रा सिंग (मणिपूर)
बुधरी थाठी (छत्तीसगड)
डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)
डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)
हेले वॉर (मेघालय)
इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
के. पंजनिवेल (पुडुचेरी)
कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (आसाम)
पोकिला लेकटेपी (आसाम)
आर. कृष्णन (तामिळनाडू)
एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)
तागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधू (बिहार)
धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)
भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
