या प्रकरणात ‘त्यांनी’ स्वत:ची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करू नये; धसांचा मुंडेंना टोला

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

  • Written By: Published:
News Photo (96)

फलटण येथे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणावरून (Phaltan) सध्या राज्यात वातावरण तापलेलं आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, बीड जिल्हा अन् एका जातीला ज्या नेत्यांनी बदनाम केलं त्याचा परिणाम सातारा महिला डॉक्टरला देखील झाला आहे. त्यांच्या या आरोपावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

नाव घेऊन बोलावं मग आम्ही बदनामी होण्यासारखं जे काही बोललोय ते पुन्हा पुन्हा बोलू, असा इशारा देत सुरेश धस यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. तसंच, तुमची बदनामी आणि डॉक्टर महिलेचं प्रकरण हे कृपया एकत्र करु नका, तुम्हाला 250 दिवस बोलता आलं नाही आणि आता त्यातून बाहेर निघाल्यानंतर कुठल्याही प्रकरणाला स्वत:शी जोडत आहे. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. डॉक्टर प्रकरणाचे कोणीही राजकारण करू नये, यात तुमचं राजकारण घुसवून स्वत:ची प्रतिमा उजळून घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Video : मी दाव्यांना घाबरत नाही! काय करायचं ते करा, अंधारेंचे निंबाळकरांवर पुन्हा गंभीर आरोप

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून, तिच्या नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही तिला मानसिक त्रास दिला. या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंते आणि आमदार सुरेश धस यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी जिल्ह्याला बदनाम केलं. त्यावेळेस बीड जिल्ह्यातील प्रत्येक जात, जमात, अठरा पगड जातीची पोरं बाहेर शिकायला आहेत. त्यांना याचा त्रास होईल, याचा कोणी केला नाही. आणि आज तोच प्रकार समोर आला. संपदा यांना या सगळ्याचा त्रास झाला. गोव सोडून कोसो किलोमीटरवर आपलं पोट भरणारे लोक किती हिणवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता टीका केली.

follow us